प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी,पाथरी
दि.७ ऑक्टोंबर सकल ब्राह्मण समाजासाठी भगवान श्री परशुराम अर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,या मागणीसाठी दि.१६ आॕक्टोबर ते २१ आॕक्टोबर २०२३ दरम्यान आझाद मैदान,मुंबई येथे अनंत (अविनाश) जोशी पालमकर व श्री रामराव जोशी पालमकर यांनी पहिल्या टप्प्यात उपोषण केले,सदरील उपोषण हे राजकीय पक्ष,संघटनेचे नसून सकल ब्राह्मण समाजाच्या मागणीसाठी केले आहे.ब्राह्मण समाज हा अर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थितीमध्ये असून समाजाची अर्थिक उन्नती व्हावी या शुध्द हेतूने भगवान श्री परशुराम अर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,हि प्रमुख मागणी असून शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या या उपोषणास राज्यातील अनेक आमदार,खासदार,राजकीय पक्ष,संघटनांकडून इत्यादी अनेक स्थरातून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळला होता व अजूनही मिळत आहे,ब्राह्मण समाजातील अनेक तरुण उच्चशिक्षीत असूनही नोकरीपासून वंचित आहेत,अल्पभूधारक आहेत,उच्च शिक्षणासाठी तसेच उद्योग व्यवसायासाठी अर्थिक पाठबळ उपलब्ध होत नाही,असे समाजाचे अनेक प्रश्न आहेत.या महामंडळाच्या स्थापनेमुळे समाजाचे अनेक प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आहे.सरकारने या उपोषणाची दखल घेऊन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले होते.ग्रामविकास मंञी गिरीष महाजन हे मा.ना.उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतील असे सांगितले होते,अद्यापपर्यंत महामंडळासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही,त्यामुळे उपोषणाचा दुसरा टप्पा दिवाळी नंतर असणार आहे. मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मा.उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस,मा.उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांनी तात्काळ आमरण उपोषण कर्त्यांच्या मागणीची दखल घेऊन सकल ब्राह्मण समाजाच्या मागणी मान्य करावी व भगवान श्री परशुराम अर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,असे मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतिने दिली.