अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव ने येथील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले उपसरपंच सौ लीलाबाई भिमराज उकिरडे हिने मराठी समाजाला राज्यात आरक्षण मिळवण्यासाठी आपल्या पदाचा त्याग केला आहे. सौ उकिरडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन, उपसरपंच पद व सदस्य पदाचा राजीनामा सरपंचाकडे सादर केला आहे. जर आपल्या समाजाला या राज्यामध्ये आरक्षण मिळत नाही म्हणून आपल्या पदाचा त्याग केला आहे. त्या महिलेचा पदाचा त्याग काय असतो हे सर्वत्र सर्व ग्रामपंचायतने या ग्रामपंचायतीचा आदर्श घेतला पाहिजे. समाजासाठी आरक्षण काय असते. महाराष्ट्र सरकारला दाखवण्यासाठी आपल्या पदाचा त्याग करून एक मोलाचे सहकार्य केले आहे. सौ लिलाबाई भीमराज उकिरडे या महिलेचा आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवून आपापल्या पदाचे राजीनामे देऊन सहकार्य केले पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकारने लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे. मराठ्यांना जर आरक्षण नाही दिले तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व पदाचे राजीनामे दिले जातील. असे मत सर्व जातीय धर्माच्या लोकांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून आपल्या पदाचा त्याग करण्याचे ठरविले आहे. 2024 ला येणाऱ्या लोकसभेच्या जागेवर मताच्या पेट्या रिकाम्या जाणार आहेत. असे मत मराठी समाज व इतर समाज करत आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर हा निर्णय घेऊन या मराठी समाजाला न्याय द्यावा ही भूमिका सर्वांची आहे.