दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा: तळोदा शहरातील मयत झालेल्याच्या अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेल्या तळोदा तालुक्यातील आमलाड शिवारात असणाऱ्या अमरधामाच्या स्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्रातील राजकारणाचा जनतेला तिटकारा,त्याचबरोबर राजकिय पक्ष्यांमध्ये सुरू असलेले सध्याचे चित्र पाहता नवनिर्माण सेनेतर्फे श्राद्ध पक्षाचे औचित्य साधत सामुहिक श्राद्ध घालुन या सर्व परिस्थितीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली असून सर्वत्र या श्राद्धाचीच चर्चा सूरू झाली आहे.महाराष्ट्रातील राजकारणाचा निषेध म्हणून तळोदा तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांनी स्मशान भूमीमध्ये जाऊन हे आगळेवेगळे आंदोलन केले आहे. गुरूवार रोजी आमलाड येथील अमरधाममधील स्मशानभूमीत जाऊन, महाराष्ट्राच्या राजकारणात सूरू असलेल्या गलिच्छ राजकारणाचे धिंडवडे काढले आहेत. गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणामुळे अनेकांच्या मनात सभ्रम निर्माण झाला आहे.महाराष्ट्रातील कुठला पक्ष खरा व खोटा तसेच कुठला पक्ष कुणाकडे आहे असा संभ्रम महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात गलिच्छ राजकारण सूरू आहे.आपल्या राजकीय सोयीच्या दृष्टीने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे.सध्याची परिस्थिती ही भोळ्याभाबळ्या जनतेला न पटणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ह्या गलिच्छ राजकारणाचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सामुहिक श्राद्ध घालण्यात आले आहे. तसेच यात कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा कार्यकर्त्याला दुखाविण्याचा प्रयत्न नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.या अनोख्या श्राद्धावेळी सेनेचे तालुका अध्यक्ष विपुल राणे, तालुका उपाध्यक्ष जयदास वळवी, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र बडगुजर, तालुका सचिव विवेकानंद महाले, शहराध्यक्ष सुधाकर माळी, शहर उपाध्यक्ष किरण माळी, पुष्पेन्द्र मराठे, शुभम कर्णकार, गणेश नवले, महेश गुरव, मनोज कोळी, रसिकलाल माळी, रत्नाकर वाघ, पुरोहित, अथर्व टोपले इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











