प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पेरणी केल्यानंतर पावसाने उघडझाप केल्याने पाण्याअभावी पेरलेले उगवलेच नसल्यामुळे पाथरी तालुक्यातील विटा लिंबा फुलारवाडी वंजारवाडी आधी भागातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत, दुबार पेरणीसाठी प्रशासनाने या शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी बाजार समिती सभापती अनिल रावजी नखाते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पाथरी तालुक्यातील दक्षिण भागात येणाऱ्या गावांमध्ये एकदम कमी झालेल्या पावसामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे,स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या दुबार पेरणीचे पंचनामे करीत त्यांना दुबार पेरणीसाठी बी बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी गुरुवार दि.२७ रोजी शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल रावजी नखाते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे बाजार समिती उपसभापती श्याम धर्मे यांच्यासह एका शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की तालुक्यातील विटा,लिंबा,फुलारवाडी,वंजारवाडी इत्यादी गावात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.पाऊस नसल्याने पहिल्यांदा केलेली पेरणी उगवलीच नाही त्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उडवले आहे,अगोदरच आर्थिक संकट उडवल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे दुबार पेरणीसाठी व्यवस्था नाही त्यामुळे गावात जाऊन महसूल यंत्रणेने दुबार पेरणीचे पंचनामे करीत शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध करून द्यावे.येत्या आठ दिवसात पंचनामे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात दिला आहे निवेदनावर बाजार समिती सभापती अनिल राव नखाते जिल्हा मध्यवर्ती बँके चे संचालक दत्तराव माळंदळे बाजार, सभापती श्याम धर्मे,बाजार समिती माजी संचालक गणेश दुगाने,विष्णुप्रसाद सीताफळे,भीमराव,गिराम बळीराम,अवचार मुंजाभाऊ,आरबाड अधिक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)