संजय काळे
ग्रामीण प्रतिनिधी नेवासा
अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची गैरसोय होताना समोर येत आहे. येथे नेवासा तालुक्यातील तेलकुडगांववरही लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेलकुडगांव ढोरजळगांव येथे जायला वर्षानुवर्षे रस्ता नाही. त्यामुळे छोट्या विद्यार्थ्यासह, वयोवृद्ध नागरिकांना तब्बल गुडघाभर चिखलातून जावे लागते . शहरातुन गावाकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक येतात शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी प्रशाननाकडे रस्त्याची मागणी करताना येथे रस्ता करून द्यावा असे म्हटलं आहे.
“तेलकुडगांव माझं आजोळ आहे.लहानपणापासून कायम येणं आहे.पण गावाला जोडणारा प्रत्येक रस्ता ह्याच प्रकारचा आहे.
सगळ्या तरुणांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन गावात येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना दबाव आणून दळणवळण मार्ग सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे.या अशा दुरावस्थेमुळे गावाच्या सुखादुखात पै पावणे कंटाळा करतात.”
- संभाजी तोडमल
आपल्या गावातील किंवा तालुक्यातील राजकारण बाजूला ठेवून, दोन मतासाठी नाही तर किमान आपल्या मुली-मुलांसाठी ,युवा वर्ग, वयस्कर माणसांसाठी तरी कमीत कमी ह्या रस्त्याला लक्ष देण्याची गरज आहे. “घोषणा”चा पाऊस नको आहे तर” कृती”होणे महत्वाचे आहे. ते पण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. पटलं तर बघा ?
- बाबासाहेब काळे (मेजर )
“आदिवासी भागापेक्षाही भयान परिस्थिती आहे रस्त्यांची, दोन गावांना जोडणारा रस्ता आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व येड्या बाभळीच्या काट्या झालेले आहेत,
पुढाऱ्यांनो जरा लाज वाटू द्या.”
- रवि सोपान काळे
“राज्यातील सर्वच पक्षातील नेते सत्तेसाठी एकत्र येऊन . सत्तेत बसू शकतात. एकच विनंती आहे गावातील सर्व पक्षातील सर्व नेत्यांनी श्रीवादाची लढाई न करता गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन पाठपुरावा करावा.”
- गणेश भेंडेकर
“सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी करा गावातील सर्व समस्या चे निराकरण झाल्या शिवाय राजकिय पुढाऱ्याना प्रवेश नाही हार तुरे खोटे बोलून वाहवाह करणे थांबले पाहीजे समस्या सुटल्याच पाहीजे असे माझे वैयक्तीक मत आहे.”
– सचिन घोडेचोर (वकील )