शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
मोताळा : मोताळा तालुक्यातील कृषी केंद्रे ही शेतकऱ्यांना खतांची विक्री ज्यादा दराने करून लुटण्याचे काम करत आहेत.अनेक कृषी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीच्या वर जबरदस्तीने विक्री करत असताना तालुका आणि जिल्हा कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.एकीकडे शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे.कापसाला भाव नाही,सोयाबीन ला भाव नाही.खते आणि बियाणे प्रचंड महाग झाली आहे,त्यातच काही कृषी केंद्र ज्यादा दराने विक्री करून एकप्रकारे शेतकऱ्यांवर अन्यायच करत आहे.त्यामुळे मोताळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे च्या वतीने आज तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित कृषी केंद्रांची तपासणी करून,कृषी केंद्रावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.जर कृषी केंद्रावर कारवाई केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना व आमचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला सदर आंदोलनात महेंद्र जाधव,मारोती मेढे,सय्यद वसीम,प्रदीप शेळके,भागवत धोरण,जाबिर भाई,राजू शिंदे,दत्ता पाटील,संदीप गोरे,पवन भारसाखळे,रघुनाथ दिवाणे ,जानराव मेढे उपस्थित होते..!