शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू येथील हुतात्मा स्मारक येथे संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे सेलूचे अध्यक्ष तथा बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी जि.प.सभापती अशोक नाना काकडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसील दार मोरे, नगरपरिषद सेलूचे उपमुख्य अधिकारी चव्हाण साहेब सामाजिक कार्यकर्ते कॉ. अशोक उफाडे, प्राध्यापक डॉ. राजाराम झोडगे, पेशकार हरीश टाक, सामाजिक कार्यकर्ते श्याम आढे, महेंद्र कोठेकर, राजेश ढवळे, नासेर भाई, पत्रकार अबरार भाई, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना अशोक काकडे म्हणाले की,”दिव्यांग भवन, दिव्यांगाच्या घरकुलाचा प्रश्न, दिव्यांगांच्या व्यावसायासाठीच्या जागेचा प्रश्न, नगर पालिकेकडून मिळणारे अनुदान, आदी नगरपालिकेकडून सोडवले जाणारे प्रश्न मागील चार वर्षापासून प्रलंबित आहेत. या साठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. अर्ज, विनंत्या केल्या आहेत परंतु सेलू नगरपालिका प्रशासनाने कुठल्याच प्रश्नाची सोडवणूक केली नाही. ही खेदाची गोष्ट आहे. यानंतरच्या काळात नगरपालिकेने दिव्यांगांच्या प्रश्नावर निर्णय नाही घेतल्यास दिव्यांग संघटनेच्या वतीने नगरपालिकेच्या समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचाही निर्धार यावेळी अशोक काकडे यांनी बोलून दाखवला.यावेळी प्रा. डॉ. राजाराम घोडके यांनी ‘जगभरात आणि देशात दिव्यांगांची लोकसंख्या सात ते आठ टक्के असून एकट्या महाराष्ट्रात दिव्यांगची लोकसंख्या सत्तर लाखाच्या आसपास आहे. परंतु एवढी मोठीलोकसंख्या असूनही राज्यकर्ते या समूहाकडे दुर्लक्ष करतात. म्हणून यानंतरच्या काळात आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिकावं लागेल. संघटीत व्हावं लागेल. आणि मग संघर्ष करावा लागेल.तरच आपले प्रश्न सुटतील असे मनोगतातून सांगितले.सामाजिक कार्यकर्ते का अशोक उफाडे यांनी मनोगतातून दिव्यांग यांच्या प्रश्नांवर सविस्तर मांडणी करून येणाऱ्या काळात दिव्यांगाचे प्रश्न सुटणार नसतील तर संघटित लढा उभा केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी चव्हाण यांनी यानंतर नगरपालिका प्रशासनाकडून दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. तर नायब तहसीलदार मोरे यांनी तहसील मार्फत दिव्यांगांची प्रत्येक मागणीची पूर्तता अद्याप पर्यंत करण्यात आलेली आहे. यानंतरही अंत्योदय योजनेचा प्रश्न असेल अथवा दिव्यांगाच्या मानधना चा प्रश्न असेल तो तहसीलच्या वतीने वेळेच्या आत सोडविण्यात येईल असे आश्वासन देत दलालांकडून दिव्यांगांची होणारी पिळवणूक थांबवण्या चे हमी यावेळी नायब तहसीलदार मोरे यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साळवे यांनी केले. यात त्यांनी दिव्यागांच्या समस्या मांडून शासन प्रशासना च्या स्तरावरून सोडविण्याची मागणी केली.या मेळाव्यात दरवर्षी प्रमाणे कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने दिव्यांग बंधू -भगिनींना भेट वस्तू देऊन दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष अब्रार पठाण, शेखर अबरार,सल्लागार जावेद पठाण, पप्पू चव्हाण, शेख नासर, प्रकाश भाले, यांच्या सह सदाशिव राखुंडे, गोविंद अवसारे, सय्यद चांद भाई ,शेख अस्मा, सलमा पठाण, शेख अहमद, रामराव घुले, रामभाऊ भगत, गणेश पडोळे , माजिद बागवान, संदीप फुलारे, अमित राठोड, शे. हामजाभाई, सौ ज्योती गायकवाड , सौ रेखा चव्हाण, सौ. बेबी साळवे, सौ संगीता पवार, कु. मंगल शिंदे, सौ. अंजना वखरे, सौ संगीता मोरे, सौ. गीता डाके, श्रीमती जनाबाई चव्हाण, शेख शकीला बाजी आदींनी प्रयत्न केले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)