शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
भारतीय जनता पार्टी सेलू तालुका वतीने निवेदन देण्यात आले.सेलू :दि. 3 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी तालुका कार्यका रणीच्या वतीने मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले गेल्या दोन दिवसा पासून सेलू तालुक्या मध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतक ऱ्यांचे अतोनात नुकसा न झाले आहे. तसेच गावागावात शहरात घरांची पडझड झाली आहे. पशुधन आणि शेतकी अवजारांची ही नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे तरी सरसकट पंचनामे करून पिढीतांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी. सेलू तालुक्यातील बरीचशी शेती अजूनही पाण्या खाली आहे पिकांची खूप नुकसान झाले आहे शेतातील पशुधन गाई वासरू जनावरे शेळ्या मेंढ्या ह्याही पुरात वाहून गेल्या आहेत. ग्रामीण भागातील गावांमध्ये आणि सेलू शहरांमध्ये घरातील पाणी घुसल्या मुळे घरांची पडझड झाली आहे. तसेच नदी नाल्याकाटच्या शेतात पूर्णपणे खरडून गेल्या आहेत तरी दोन दिवसा त तात्काळ पंचनामे करावे असे भारतीय जनता पार्टी तालुका यांच्यावतीने तहसील दार साहेबांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना यावेळी भाजपा जिल्हा महा मंत्री अर्जुन बोरुळ, भाजपा तालुका अध्य क्ष दत्ता कदम, अशोक दादा अंभोरे, शहराध्य क्ष,रविभाऊ डासाळ कर मा. सभापती, शिवाहरी शेवाळे सर चिटणीस,कपिल फुलारी चिटणीस, भास्कर आबा पडघन, पांडू तात्या, अशोक भाऊ शेलवाडीकर, सोळंके,अशोक ताटे, अजू भाऊ डासाळकर, महेश टाक,प्रकाश गजमल,विकास ताठे, प्रकाश ताठे,संजय गटकळ, केदारेश्वर मोगल ,संदीप घुगे,रामजी डक, सुंदर गाडेकर,गोविंद शर्मा, अमोल भोसले आदी जण उपस्थित होते.