कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील काजीपुर शिवारात आज दि. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजे दरम्यान बिबट्याने हल्ला करून आजी व नातू यांचेवर हल्ला करीत ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील नागरीक, शेतकरी, शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सदर बिबट्याच्या वनविभागाने तातडीने बदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. याबाबतची सविस्तर माहीती अशी की दि. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास काजीपूर शिवारातील अतुल पांडूरंग सुर्यवशी याच्या मळ्यात रखवाली करणारी साकरा खेमा तडवी वय 50 ही महिला मजुरीसाठी शेतात गेली होती. तिला यायला उशीर झाल्याने नातू श्रावण शिवाजी तडवी वय 9 वर्ष हा शोधण्यासाठी गेला होता. परत येत असतांना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक श्रावणवर हल्ला करीत त्याला ऊसाच्या शिवारात फरफटत नेले. आजी साकराबाईला श्रावणचा आवाज आल्याने ती त्यांच्या मागे धावली. बिबट्याने साकराबाईवर देखील हल्ला करीत तीच्या छातीच्या भाग खाऊन फस्त केला. बिबट्याच्या आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतातील ररववालदार येत शोधा शोध सुरू केली. त्यावेळी त्यांना ऊसाच्या शेतात दोघांचे मृतदेह आढ़ळून आलेत. घटनेची माहिती मिळाल्याबरोबर वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी आपल्या ताफ्यासह दाखल झाले. दोघांचे मृतदेह शवविच्छेधनासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलेत. मागील आठवड्यात चिनोदा येथे सुद्धा बिबट्याच्या हल्यात एका बालकाचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असताना परत बिबट्याच्या हल्यात दोन जणांचा बळी गेला आहे. आता तरी वनविभाग बिबटचाला जेरंबद करण्यासाठी हालचाल करतील की पुन्हा आणखीन अशी घटना व्हावी याची प्रतीक्षा करीत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.