मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे : पाथरगाव येथील शेतकरी अरुण पुंडलिक गवई यांचे शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी मागील सहा दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण सहाव्या दिवशी अखेर प्रशासनाच्या वतीने सोडण्यात आले. चांदुर रेल्वे तालुक्यातील पाथरगाव येथील शेतकरी अरुण पुंडलिक गवई यांचे स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे व शेजारील कास्तकाराने शेतात जाण्या येण्याचा रस्ता बंद केल्यामुळे माझ्या शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी मागील सहा दिवसापासून उपोषणास बसले होते. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत चालली होती. अखेर आज सहाव्या दिवशी प्रशासनाने उपोषणकर्त्याची मागणी हे निवेदनातील मागणी ही रस्ता विषयक असल्यामुळे व सदर बाबी अर्धन्यायिक प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे व तहसीलदार चांदुर रेल्वे यांनी दिनांक 20/7/ 2024 रोजी रस्ता विषयक प्रकरणांमध्ये आदेश पारित केलेला असल्यामुळे आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 247 अन्वये अपील दाखल करावे व नियमांमधील तरतुदीनुसार आपल्या निवेदनातील नमूद बाबी बाबत योग्य ती कारवाई करून उचित आदेश पारित करण्यात असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. उपोषण सोडतेवेळी नायब तहसीलदार डी एस वासनिक, एस इ अनासाने, एल एस तिवारी, श्रीमती प्राजक्ता बारसे, अंकुश तिवारी, सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अशोकराव चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिभाऊ गवई, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते देविदास राऊत, माजी उपसरपंच इंद्रपाल बनसोड, तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू शर्मा, बंडू आठवले, राजेश सराफी, प्रकाश रंगारी,अभिजीत तिवारी,निलेश जाधव,नितीन जाधव, नरेश स्थूल यावेळी उपस्तित होते.