बद्रीनारायण गलंडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली, दि. 02 : खरीप 2024 हंगामात पेरण्या सुरु झाल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी एक रुपयात प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होऊन पिकांना विम्याचे संरक्षण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये घेतला आहे. योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 5 लाख 12 हजार 439 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये सहभाग नोंदविला होता. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया भरून आपल्या पिकांना पिक विम्याचे संरक्षण घ्यावे, असे आवाहन केले आहे.विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी केंद्रास 40 रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी केंद्रास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी केंद्र चालकांना देऊन अर्ज करावा. केंद्रचालकांनी अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे संपर्क केल्यास केंद्रचालकावर कायदेशीर कारवाई करता येईल. कोणत्याही सीएससी केंद्र चालकाने अथवा शेतकऱ्याने शासकीय जमीन, शासकीय गायरान, मंदिर, देवस्थान, संस्थान जमीन अथवा दुसऱ्या शेतकऱ्याचा परस्पर पिक विमा उतरवू नये, अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.शेतकऱ्यांनी विमा काढताना ही काळजी घ्यावी अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. पिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच असावा. पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टल द्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपला बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो. आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे.विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने हे करावेअधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. त्यासाठी अंतिम दिनांकाच्या 7 दिवस अगोदर कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये अर्ज देणे आवश्यक (अनिवार्य) आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला सातबाराचा उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, पिकपेराचे स्वयं घोषणापत्र व आवश्यक ठिकाणी नोंदणीकृत भाडेपत्रक-कारारनामा अपलोड करावा. योजनेत सहभागी होण्यासाठी आपण प्राधिकृत बँक, कॉमन सर्विस सेंटर अथवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेता येईल.योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत दि.15 जुलै 2024 आहे. परंतु, सर्व शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता आपल्या पिकाचा पिक विमा उतरवून घ्यावा. मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता बँक व्यवस्थापक माहिती देऊ शकतो. योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 संबंधित विमा कंनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)