अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
आधार कार्ड कोणत्याही शासनाच्या योजनेसाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेल्या दस्तऐवज म्हणजेच आधार कार्ड झाले आहे. एवढे असून सुद्धा कोणत्याच आधार केंद्रावर आधार अपडेट करून नावात दुरुस्ती करण्याची उपाययोजना नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. ढाणकी ची लोकसंख्या ३५ते ४० हजार त्यात ४० ते ५० खेडेपाडे त्यात आधार केंद्रावर सुद्धा खूप गर्दी आहे. सध्या शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस त्यात अनेक चक्रा मारून पायमल्ली करून सुद्धा आधार कार्ड वरील नाव दुरुस्ती होत नाही. कामधंदे सोडून तालुक्याच्या ठिकाणी आधार कार्ड साठी उमरखेड तहसील येथे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यासह पालकाचे नुकसान होत असून कामाची सुद्धा बुडवणुक होत आहे. त्यात आता विद्यार्थ्यांचे ऍडमिशन यासाठी आधार कार्ड सक्तीचे झाले आहे. एवढे असून सुद्धा कोणत्याच आधार केंद्रावर नाव दुरुस्ती होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहे. त्यातच शासनाच्या महात्मा फुले जीवन आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जीवन आरोग्य दाई योजना याचा सुद्धा गोरगरिबांना लाभ होत नाही. राशन कार्ड वर जे नाव आहे तेच आपल्या आधार कार्ड वर नाव असणे आवश्यक आहे त्यात थोडाही वेलांटी मात्रा किंवा स्पेलिंग मध्ये फरक असता कामा नये असा नियम आहे. परंतु आधार कार्डवर नावात किंवा आडनावा मध्ये एखाद्या स्पेलिंग ची सुद्धा मिस्टिक झाल्यास तो त्या योजनेपासून वंचित राहतो. म्हणून संबंधित विभागाने अशा समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन . ढाणकी सारख्या ठिकाणी आधार कार्ड नाव दुरुस्ती साठी उपायोजना कराव्यात व तसेच शाळेत किंवा अंगणवाडीत कॅम्प घेऊन आधार कार्ड नाव दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात यावे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा वेळ वाचून शेतकऱ्याच्या कामात अडथळा निर्माण न होता , विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा त्रास होणार नाही. अशा उपायोजना त्वरित कराव्या असे नागरिकांच्या वतीने सुद्धा बोलले जात आहे.