सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
देशात लोकसभेची धामधूम सुरू आहे त्या विविध घोषणांचा पाऊस पडतो आहे सातपुड्यातील दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणासाठी शाळा नसल्याने ३० वर्षांपासून नर्मदा नवनिर्माण आंदोलनातर्फे अनेक ठिकाणी नागरिकांच्या सहकार्याने नर्मदा जीवन शाळा चालवण्यात येत आहेत.नुकतेज मुसळधार पावसामुळे या शाळेचे मोठे नुकसान झाले असून सुमारे ७०० विद्याथ्र्यांचा शिक्षणाचा प्रश्र्न उपस्थित झाला आहे. नदुरबार हा मागास असुन जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षीत जिल्हा घोषित केले होता. नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतर कुपोषण अशा अनेक समस्यांनी घेतला आहे.त्यातच सातपुड्यातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कुठलीही सोय नसल्याने अनेक गावांमध्ये नर्मदा नवनिर्माण आंदोलनात तर्फे याबाबत विविध मागण्या करुन हि प्रशासन व शासन याकडे लक्ष देण्याचे गांभीर्य दाखवले नाही त्यामुळे सुमारे३० वर्षांपूर्वी नर्मदा नवनिर्माण आंदोलनातर्फे अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक दुर्गम भागात कुडाच्या, पञ्याच्या,कैलाच्या झोपड्या बांधून नर्मदा जीवन शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांना शासनाने मान्यता दिली मात्र कुठल्याही कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत केली नाही त्यामुळे या शाळा लोक वर्गणीतुन सुरू होत्या याबाबत शासनकडे अनेकदा पाठपुरावा करून ही शासनाने कुठलेही लक्ष दिले नाही राज्यातील प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र या नर्मदा जीवन शाळेमध्ये होत दरम्यान मतदानानंतर सायंकाळी आलेल्या सोसाट्याच्या वारा व पावसामुळे मनिबेली,डनेल,थुवाणी येथील जीवन शाळेचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने शाळाना सुट्टी असल्यामुळे कुठलीही जिवित हानी झाली नाही मात्र शाळेचे नुकसान झाल्याने ठिकाणी शिकत असलेल्या ७०० विद्यार्थ्याचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण कसे घ्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजी ६ तास बोटीने प्रवास करुन शिक्षणासाठी दुसरीकडे जाणे या विद्यार्थ्यांना शक्या नाही त्यामुळे शासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते हा यक्ष प्रश्न आहे.


