शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
आम्ही शब्द पाळतोय शासनाने सुद्धा आपला शब्द पाळावा, सेलूत दणदणीत जाहीर सभा; लाखो समाज बांधव सभेस हजर
सेलू : दि.22 डिसेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणा साठी मा.मनोज जरांगे पाटील यांची जोरदार सभा व्हावी म्हणून सकल मराठा समाजातील लोंकाची इच्छा होती त्यासाठी अथक प्रयत्नातानला अखेर यश मिळाले.शेवटी सेलूकारांचे आज स्वप्न पूर्ण झाले. सेलूच्या भव्य अश्या नूतन महाविद्याल्याच्या मैदानावर लाखो समाज बांधवाच्या उपस्थितीत आज मा.मनोज जरांगे साहेबांची सभा पार पडली. या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील म्हणाले की,आम्ही शासनाचा शब्द पाळतोय शासनाने त्यांचा शब्द पाळावा.शासनाने अनेक वर्षांपासून मराठा समाजावर अन्याय केला असून आत्तापर्यंत शासनाने समाजाची बनवा बनवी केली आहे.परंतु आत्ता समाज जागृत झाला असून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.आम्ही शब्द पाळतोय शासनाने ही शब्द पळवा असे प्रतिपादन केले. आरक्षणाच्या आड येणार्या व्यक्तीची आपण वेळप्रसंगी नावे जाहीर करु, असा गंभीर इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी (दि.22) सेलू शहरात आयोजित केलेल्या जंगी जाहीर सभेतून दिला.मराठायोध्दा जरांगे पाटील यांच्या पाचव्या टप्प्यातील दौर्यात शुक्रवारी सकाळी सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दणदणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस समाज बांधवाची मोठी गर्दी उसळली. या सभेत जरांगे यांनी, मराठा आरक्षण हे आपल्या अंतिम टप्प्यात आले आहे, असे स्पष्ट करीत या निर्णायक लढाईत सर्वसामान्य समाजबांधवांनी आपल्या पाठीशी भक्कम अशी साथ उभी केली. त्याचाच तो परिणाम आहे, असे नमूद केले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या लढाईत समाजबांधवांनी दिलेल्या योगदानाचे मुक्तकंठाने कौतूक करतेवेळी या संघर्षात काही व्यक्ती आडव्यासुध्दा आल्या. वेळप्रसंगी त्यांची निश्चितच नावे जाहीर करु, असा इशारा देवून जरांगे यांनी जो आड येईल त्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही, असाही इशारा दिला.करोडोंच्या संख्येने मराठे एकत्र आले, ही लाट आता साधीसुधी नाही, असा टोला राज्य सरकारला लगावते वेळी तुमच्या नोटीसीला घाबरून ही लाट मागे फिरणार नाही, धमक्यांना घाबरत नाही, असे नमूद केले. आम्ही धमक्या देत नसतो. आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. लोकशाहीप्रमाणे लढा सुरु आहे. ही सभा नाही, मराठ्यांची वेदना आहे, असे स्पष्ट करतेवेळी जरांगे यांनी आरक्षणाची 80 टक्के लढाई आपण जिंकलो आहोत,समाज बांधवांच्या जीवावरच, साथीवरच, प्रेमावरच ही लढाई लढली जात आहे. समाजबांधवांनी सुध्दा या निर्णाय लढाईत आता मैदानावर उतरले पाहिजे. आता हटायची वेळ नाही, हे आरक्षण कसे देत नाही ते बघतोच, नोटिसीला आपण घाबरत नाही, आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही, असा इशारा देवून जरांगे यांनी मराठा समाजबांधवांनी सावध रहावे, एकजूट रहावे, अशी संधी पुन्हा येणार नाही, असेही नमूद केले. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या सभेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सभेपूर्वी त्यांचे सेलू शहरात आगमन झाले त्यावेळी त्यांचे सेलूतील सकल मराठा समाज बांधवांनी 51 जेसीबी च्या सहाय्याने फुलांची उधळण करत वाजत गाजत करीत जंगी स्वागत करून सभेस्थळी नेण्यात आले.यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या असलेल्या नागरिकाकांनी फुलांचा वर्षाव केला तसेंच जागोजागी मुस्लिम बांधवाकडून खिचडी, चहा,पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर अनेक समाज बांधवानी सुद्धा शहरात येणाऱ्या चारिबाजूंच्या येणाऱ्या समाज बांधवाना चहापाणी,नाष्ट्याची सोय केली होती. सभेस्थली पोलिस प्रशासनांकडून चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच एक हजार स्वयंसेवकांनी सहकार्य केले. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणले होते. सभास्थळी व संपूर्ण शहरात तसेच मार्गावर भगवे झेंडे मोठ्या दौलाने फडकत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती झाली होती. या सभेस आसपासच्या खेड्यापाड्यातील समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. लाखो तरुण, तरुणी, पुरुष, महिला समाज बांधव उपस्थित होते. सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.