गजानन वानोळे
ग्रामीण प्रतिनिधी किनवट
गोकुंद्यातील खाजगी शिकवणी केंद्रातील (कोचिंग क्लाॅसेस) विद्यार्थीनींना रोडरोमिवोंकडून होणारा त्रास थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन पुढे येणार की नाही ? असा संतप्त सवाल कूला जात आहे. अल्पवयीन व टुकारटेकड्यांनी बुलेटगाड्यांवर सायलेंसर काढून कर्णकर्कश आवाजात कोचिंग क्लाॅसेसच्या समोरुन वाहनांचा धांगडधिंगा घातला जात आहे. क्लाॅसेस भरतेवळी आणि सुटतेवेळी रस्त्यांनी मुलींना छळण्याचे प्रकार घडतात. रोडरोमिवो मुलींच्या जवळून कटमारुन सुसाट वेगाने गाड्या पळवतात. अशांचा बंदोबस्त करण्यासाठी नेहमीच पालकिंनी, पत्रकारांनी, क्लाॅसेसचालकांनी आणि गोकुंदा ग्रामपंचायतीने देखिल पोलीसांना कळवल्यानंतर दोन दिवस बंदोबस्त करतात परंतू कायम बंदोबस्ताची व्यवस्था केलेली नाही हे उल्लेखनीय आहे.
अल्पवयीन, श्रीमंत आणि राजकारण्यांच्या आडोशाखाली रोडरोमिवोंचा उद्रेक खुल्लेआम चालू आहे. पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध नसल्याची पोलीस प्रशासन सबब पुढे करुन बंदोबस्त टाळत असल्याची चर्चा ऐकायला मिळते. जागा देण्यास ग्रामपंचायतही हतबल झाली आहे. त्यांच्या मालकीची साधी चौकीपुरती जागा ते ठेऊ शकले नाहीत हे ग्रामस्थांचे दूर्दैव म्हणावे लागेल. लोकांच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलीत पण धूळखात पडलीत त्याचा तिळमात्र उपयोग ना रोडरोमिवोंना त्याचा धाक राहिलेला नाही. ग्रामपंचायतीतील सत्तांतरानंतर अशा बाबींवर आळा बसेल या हेतुनेच परिवर्तन घडवले परंतू मागच्यांचीच सर्रास पुनरावृत्ती केल्याचे दिसते. विद्यार्थीनींच्या निर्भयतेची आणि संरक्षणासाठी धाडसाचे पाऊल यांनी टाकलेले नाही.
दोन दिवसाचा पोलीस बंदोबस्त चालू झाल्यानंतर हा कायमचाच बंदोबस्त आहे असे गृहीत धरुन कोचिंग क्लाॅसेस, पत्रकारं आणि पालकांमध्ये श्रेयवाद रंगला होता. बंदोबस्त थांबल्यानंतर कोणीही पुढे आलेला नाही. शेवटी २० डिसेंबर रोजी युवा ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुहास मुंडेंनी किनवट पोलीसात निवेदन दिले आहे. एखादी अप्रीय घटना घडल्यानंतर पोलीस बंदोबस्त मिळणार की निवेदनाची तात्काळ दखल घेणार याकडेच हतबल झालेल्यांचे लक्ष लागून दिसते. मागच्या बंदोबस्तातील अनेक गोष्टी समोर आल्या. रोडरोमिवोंच्या गाड्या रोखण्याऐवजी शेळ्यामेंढ्यांसह अन्य वाहतूक करणार्या गाड्या रोखल्याचे प्रकार पहायला मिळत होते अशीही चर्चा त्यावेळी ऐकायला मिळत होती.