गजानन वानोळे
ग्रामीण प्रतिनिधी, किनवट
दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे आस्मानी संकटाने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकरी वर्ग फार मोठ्या अडचणीत येत असतात. सावकारी कर्ज काढून शेतीमध्ये बी – बीयाणे खते औषधी खरेदी करून शेतीची मशागत करून पेरणी करतो . त्यात आस्मानी संकटाने त्रस्त होऊन कर्जबाजारी होत आहे. या कर्जबाजारीपणा वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे अशा उद्देशाने आखिल भारतीय परिवार पार्टीच्या वतीने कर्जमुक्त भारत अभियानांतर्गत निशुल्क फार्म भरून नाव नोंदणी करण्याची मोहिम अनिल मोहिते हिंगोली लोकसभा प्रभारी महाराष्ट्र सचिव यांनी हिंगोली मतदार संघात शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमुक्त अभियान मोहिम सुक करून निशुल्क फार्म भरणे सुरू केले आहे.
हिंगोली मतदार संघातील सर्व शेतकर्यांना आखिल भारतीय परिवार पार्टीचे अनिल मोहिते यांनी अवाहन केले आहे का, हिंगोली मतदार संघात कर्जमुक्त भारत अभियान चालू आहे जे कोणी कर्जबाजारी लोक असतील त्यांनी 8605947707 या नंबर वर संपर्क करून कर्जमुक्त भारत अभियान यामध्ये फार्म भरून लाभ घ्यावा.