संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली.
जिल्हा परिषद शाळा असलदे गावठाण नंबर दोन या शाळेचा अमृत महोत्सव ०२ नोव्हेंबर२०२३ रोजी होत आहे. या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांना आनंद झाला असून या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत होते .मात्र हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी गावातील ग्रामस्थांना ७५ वर्षे वाट पहावी लागली. कै. तातोबा विश्राम घाडी यांनी ७५ वर्षांपूर्वी गावातील मुलांना इमारत प्रदान केली .कालांतराने इमारत जिल्हा परिषदेकडे वर्ग देखील झाली. कै. तातोबा विश्राम घाडी यांनी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. यांचं कार्य फार मोठा आहे .त्यांना साथ देण्यासाठी काही दानशूर व्यक्तीनी जमीन देखील शाळेला दान केली .या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून या दानशूर व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी तशा प्रकारची संधी आम्हा गावातील ग्रामस्थांना सध्या मिळाली आहे असे गावकऱ्यांनी प्रतिपादन केले. कै. तातोबा विश्राम घाडी हे आमच्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कुटुंबीयांचा योग्य तो सन्मान करणार आहोत .या कुटुंबाने सुद्धा शैक्षणिक कार्यासाठी फार मोठं योगदान दिलं आहे. ज्या व्यक्तीने शाळेसाठी जमीन दान केली त्यांचा सन्मान केला जाणार आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आजी-माजी शिक्षक वर्ग, उच्चशिक्षित विद्यार्थी, दहावी- बारावी पदवीधर तसेच राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यांचाही यथोचित सत्कार केला जाणार आहे. ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी हा अमृत महोत्सव सोहळा संपन्न होणार असून सकाळी ७.३० वाजता सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आला आहे. तसेच ९.३० ते ९.४५वा. राष्ट्रगीत, ९.४५ते१०.०० वाजता स्वागत गीत, २०.००ते१०.१५वाजता प्रस्तावना , १०.१५ते१०.३० वा.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी माननीय प्रदीप कुमार कुडाळकर (प्राथमिक शिक्षणाधिकारी ) उपस्थित राहणार आहेत .तर माननीय किशोर गवस (गटशिक्षणाधिकारी) यांचीही उपस्थित लक्षनिय ठरणार आहे. सकाळी १०.३० ते १०.४५ वाजता शाळा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले जाईल, १०.४५ते १२.१५ सत्कार समारंभ ,१२.१५ ते १२.३० वाजता मनोगत ,दुपारी ०२ ते०३ या वेळेत महाप्रसाद. ०३ते०६ वा.महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ०६ ते०७ वा स्थानिक गावातील भजन आणि रात्री आठ वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम हे करणार असून अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष अनिल तांबे, सचिव अनंत पाताडे, उपाध्यक्ष शामराव परब ,सहसचिव सुरेश सुतार ,सदस्य देविदास जांभळे, जयप्रकाश पाताडे ,सचिन परब, संतोष घाडी ,अशोक पाताडे, महादेव परब, दिनेश शिंदे, सदाशिव घाडी ,प्रशांत तांबे, सुधीन तांबे ,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)