मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदूर रेल्वे : ग्रामीण रुग्णालयात मागील काही दिवसांपासून रूग्णांना तासनतास रांगेत उभे राहवे लागत असूनच बुधवारी सकाळी रुग्णालयातून अचनाक माजी आमदार यांना फोन आला की भाऊ सकाळ पासून रांगेत आहो, इथे न कोणी डॉक्टर आहे न कोणी काही सांगत आहे, लहानमूल आहे, बाया आहे पण कोणाकडेच येथील कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही.त्यावरूनप्रा.जगताप सरळ चांदूर रेल्वेच्या ग्रामीण रुग्णालयात पोहचले व आयोग्य अधिकारी चर्चा करत स्थानिक रुग्णालयातील परीस्थिती सांगत लवकर सुधारणा करा, नाही तर रुग्णालयाला कुलूप लावणार, असा इशाराही त्यांनी आरोग्यप्रशासनाला दिला. सविस्तर माहितीनुसार, २५ ऑक्टोंबरपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांचा बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असल्याने सकाळी ओपिडी मध्ये कोणी नोंदणीसाठी नाही.तर रुग्णांना चिट्ठी देणे,त्यांना औषध वाटप करणेतरत्यांनातपासणे,मलमपट्टीकरणे, रक्ताचीतपासणी करणे, झालेल्या तपासणीचा रिपोर्ट देणे इत्यादी सर्वच कामे खोळंबलीअसल्याचे माजी आमदार जगताप यांना पाहायला मिळाले. त्यावरून प्रा. वीरेंद्र जगतापचांगलेचसंतापले, त्यांनी कर्मचारी यांचे रजिस्टर तपासले असता त्यात २२ कर्मचारी कंत्राटी तर २५ कर्मचारी नियमित असे ४७ कर्मचारी कार्यरत असून त्यातील केवळ १२ कर्मचारी आंदोलनात सहभागी होते.असे असतांना इतर वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह इतर सहाय्यक कर्मचारी कुठे गेलेत यावर उपस्थित कर्मचारयांना जाब विचारला. त्यावरून कोणी दीर्घ रजेवर, कोणाची सेवा अधिग्रहित केलेली, तर कोणी ड्युटी करून घरी गेल्याचे समजले.यामुळे रुग्णालयातील सर्वच यंत्रणा कोलमडल्याचे पाहायला मिळाले. यावरून वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोन वरून माहीती देत चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष देण्यासाठीसांगितले.यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापट यांना परिस्थिती सुधारा अन्यथा आम्ही ग्रामीण रुग्णालयाला कुलूप लावू असा इशाराही दिला. यावेळी त्यांचसोबत शहरातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासकीय योजना व कार्यालय कंत्राटी कर्मचारीच्या भरोशावर
महाराष्ट्र सरकारचे कार्यालय व यंत्रणा कंत्राटीच्या भरोशावर असल्याचे चित्र दिसून आले कारण कंत्राटी कर्मचारी गेल्या १५ वर्षांपासून शासन सेवेत काम करीत आहे.या कर्मचाऱ्यांनी काही मागण्या सरकार समोर ठेवत सरकारी सेवेत कायम करणे वमानधनात वाढकरणेयामागण्यांसाठी त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा पहिल्याच दिवशी ग्रामीण रुग्णालयातील रूग्णांना फटका बसला आहे.