अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
पालघर : जिल्हातील शेवटचा तालुका असलेला म्हणजेच तलासरी होय, मुंबई ते अहमदनगर ही हायवे असल्यामुळे तलासरी या ठिकाणी एक उडान पूल बनविण्यात आलेलं आहे, मात्र यांचं ब्रिज खाऊन तलासरी ते उंबरगाव, तलासरी ते वापी, तलासरी ते चारोटी, तलासरी ते उधवा या चारही बाजूनी अवजड वाहने जात असल्यामुळे येथील ब्रिज खाली तलावा सारखे खडे पडलेले दिसून येतात, येथील नागरिकांनी तक्रार करून सुद्धा खडे बुजाण्याचे काम अद्यापही झालेलं नाही, येथील स्थानिक संपत झालेले आहेत, या रस्त्यावरून अवजड वाहने जाण्यासाठी परवानगी नसून ही तलासरी येथील काहीक दलाल हप्ते घेऊन गाडयांना या मार्गाने अवजड वाहने जाऊ देत असल्यामुळे तलासरी मध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत,असा या कारभारामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ट्राफिक होताना दिसतो,
संतप्त नागरिक प्रश्न उपस्थित करताना की या खड्यांमुळे खूप सारे ऍक्सीडेन्ट ही झालेले आहेत, तरी सुद्धा येथील खड्डे जसाचे तसे आहेत, मग कोणाचा जीव गेल्यावर तुम्ही खड्डे बुजवणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.