प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी : तालुक्याचे पेरणीचे सरासरी क्षेत्र 44 हजार 950 हेक्टर आहे. अल्पशा झालेल्या पावसावर कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार शेतकऱ्यांनी सोमवार 31 जुलै पर्यंत 38 हजार 563 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या केल्या आहेत. यात यंदाही शेतकऱ्यांनी कापूस पिकास पहिली पसंती दिली असून 17 हजार 940 हेक्टर वर कापूस लागवड करण्यात आली आहे. तर 16 हजार 276 हेक्टरवर सोयाबीन, 3 हजार 234 हेक्टर वर तूर, 795 हेक्टर वर मुग, 174 हेक्टर वर उडीद, 75. हेक्टर हेक्टर बाजरी, आणि केवळ 2 हेक्टर वर तीळ, याप्रमाणे जुलै च्या 31 तारखेपर्यंत 38 हजार 563 वर पेरण्या झाल्या आहेत. या पेरण्यांना आता पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. खरीपा मध्ये अनेक नक्षत्र कोरडे गेले आहेत. त्यामुळे पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांवर विविध रोगराईचा प्रभाव दिसून येत आहे. परिणामी पिकांच्या उत्पादनात ही मोठी घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)