गजानन वानोळे ग्रामीण प्रतिनिधी किनवट
:भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मातंग समाजाला सामाजीक,शैक्षणिक आरक्षणाचा फायदा प्रत्यक्षात होत नाही. यामुळे समाजातील शिक्षित मुलांना कोणताच फायदा होत नाही.हा विषयी दिं. ०१जुलै २०२४ पासून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक/अध्यक्ष प्रा.रामचंद्रजी भरांडे सर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर विविध मागण्या घेऊन बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेले आहे. महाउपोषण मागील बारा दिवसांपासुन चालत आहे. प्रा.भरांडे सरांची तब्येत सतत खालावत आहे.त्यामुळे महाउपोषणाला जाहीर समर्थनार्थ व लाभ वंचित घटकांना स्वतंत्र अ ब क ड आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावे.अशी न्यायाची मागणी घेऊन आज दिं.११जुलै २०२४ रोजी मौजे ईस्लापुर येथील किनवट-हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर जिल्हाचे धोंडोपंत बनसोडे, सदानंद ऐरणकर पार्डीकर यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे. रास्ता रोकोमध्ये कार्यकर्ते आक्रमक होऊन राज्य शासनाच्या विरोधात गगन भेदी घोषणा देत लक्ष वेधून घेतले होते. येणाऱ्या काळात येथील खासदार,आमदार यांनी आमच्या मागण्या विषयी सभागृहात प्रश्न उपस्थित नाही केल्यास, लोकप्रतिनिधीच्यां प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले जाईल,असे ही भावना कार्यकर्ते यांनी व्यक्त केल्या आहेत.तसेच तालुका पदाधिकारी व समाज बांधवासह शेकडो महिलांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर उतरून रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे शेकडो वाहने दीड तासापासुन रस्त्यांवर अडकून पडली होती. राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवर वाहतूक थांबल्यामुळे लांबलचक रांगा लागल्या होत्या. यामुळे अनेक प्रवाश्याचे बेहाल झाले होते.अखेर या ठिकाणी तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी व सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले ईस्लापुर यांना निवेदन देऊन आमच्या तीव्र भावना सरकारकडे रास्ता रोकोच्या माध्यमातून कळवावे.असे म्हणत आंदोलनाची सांगता करण्यात आली होती.या रास्ता रोको आंदोलनामध्ये धोंडोपंत बनसोडे, सुरेश झुरेकर,पत्रकार दशरथ आंबेकर,रामदास जळपते, शिवाजी तपासकर, रेखाबाई झुरेकर,राधाबाई गड्डेल्लु, मुक्ताबाई राजेन्ना,सत्वशीला बोनगीर,सुनंदा बेदमपल्ली, गजराबाई विरेल्लु, लक्ष्मीबाई दर्शनम,संजय झुरेकर, आनंद बोनगीर, नागनाथ होम्पलवार, गोविंद जळपते,प्रदीप डुडेल,बबनराव जळपते, सिद्रामप्पा जळपते,आडेलु जळपते, अमोल जळपते, मारोती जळपतेसह परिसरातील समस्त समाज बांधव,महीला,युवक यावेळी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.