स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरात दि.31मे रोजी अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आले. या अतिक्रमण हटाव मोहिमेचा बडगा रोज मजुरी करणाऱ्या छोट्या छोट्या व्यवसायावर पडला. छोटे व्यापारी मिळेल त्या ठिकाणी जागा धरून छोटा व्यवसाय करतात. व आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. परंतु प्रशासनाने काल राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे छोटे व्यापारी मोठ्या संकटात सापडले आहेत. जेमतेम चालणाऱ्या आपल्या छोट्या व्यवसायात कशीबशी मजुरी पाडून आपला उदरनिर्वाह करणारी छोटे व्यापारी यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा टाकला आहे. आता संसाराचा गाडा हाकला यांचा कसा, पुढे तर पावसाळा आहे. असा असंख्य प्रश्नाची सरबती करतानाची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)