स्वरूप गिरमकर
ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : पुणे-नगर महामार्गावर सर्वात मोठ्या व व्यापारीदृष्ट्रया आणि औद्योगिकदृष्ट्या संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या कोरेगाव भिमा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप ढेरंगे यांची बहुमताने निवड झाली आहे.
शिरूर तालुक्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या सरपंचपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ग्राम पंचायत सदस्य सरपंच संदीप ढेरंगे यांनी १० मते मिळवून बाजी मारली त्यांच्या विरोधात असणारे ग्राम पंचायत सदस्य केशव फडतरे यांना ७ मते मिळाली. यावेळी संदीप ढेरंगे यांना बहुमत मिळाल्याने सरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास फुके यांनी सांगितले.यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे व ग्रामविकास अधिकारी रतन दवणे उपस्थित होते.या निवड प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ ( पि.के) गव्हाणे, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, घोड गंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, माजी अध्यक्ष पंडित ढेरंगे, माजी अध्यक्षा. बबुशा ढेरंगे, ग्राम पंचायत सदस्य महेश ढेरंगे ,शरद ढेरंगे ,वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, कोमल खलसे, मायंबा ढेरंगे, राजू नळकांडे, पेरणे गावचे मा. उपसरपंच रविंद्र वाळके,स्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेचे राजेश सिंह ढेरंगे उपस्थित होते.या निवडणुकीसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, संदीप कारंडे, पोलीस पाटील मालन गव्हाणे उपस्थित होते.या वेळी प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित सरपंच संदीप ढेरंगे म्हणाले की “कोरेगाव भिमा गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे.कोरेगाव भिमा गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून परिसरातील मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.”
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)