प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले
भादोले ता. हातकणंगले येथीलगावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुधारीत वाढीव पाणीपुरवठा योजना मंजुर करावी या मागणीसाठी सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत, त्यास माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रवीण यादव यांनी भेट देऊन पाठींबा दिला.यावेळी डॉ. सुजित मिणचेकर बोलताना म्हणाले भादोले गाव नदी काटापासून जवळ आहे पण पाण्यासाठी वणवण करावी लागते. शासनाकडून ४ कोटी ९६ इतका निधी मंजूर झाला पण या निधीत पाणी योजना पूर्ण होत नाही. सध्या गावातील जूनी पाण्याची टाकी पडण्याच्या अवस्थेत आहे, तर गावची जुनी पाईप लाईन असेल, शुद्ध पाण्यासाठी आवश्यक असणारा पाण्याचा फिल्टर हाउस बांधणे, तसेच गावची लोकसंख्या पाहता हा निधी अपुरा आहे. भादोले गावचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचा- यतीने ८ कोटी ३६ लाख इतका सुधारीत आराखडा पाठवला असून हा आराखडा मंजुर करून देण्यात यावा व योजना मार्गी लावण्यासाठी संबधित अधिकारी यांच्याशी फोन वरून संवाद केला लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.यावेळी उपोषण स्थळी सरपंच स्नेहा पाटील ,उपसरपंच अलका पाटील, संगीता पाटील, मयूरी पाटील, सुवर्ण धनवडे, मालुताई कोळी, रूपाली कोळी, गीता अवघडे, दिलीप पाटील, धोंडीराम पाटील, राहुल पाटील, गणपती पाटील, सुनील काटकर, भगवान घोलप, तोफिक सनदे,अमोल कोळी, संजय पाटील, उल्हास पाटील, सूर्यकांत पाटील,रमेश कांबळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)