संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनीधी इंदापूर
रूई (इंदापूर) -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा चालू शैक्षणिक वर्षांमध्ये रुई केंद्रावर प्रथमच सुरू करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.पेपर कसा सोडवावा याबद्दल प्राथमिक माहिती देण्यात आली.याप्रसंगी श्री हरणेश्वर विद्यालय कळस चे प्राचार्य रामचंद्र पवळ,श्री अंकलेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ सानप हे उपस्थित होते.या केंद्रामध्ये श्री हरणेश्वर विद्यालय कळस,श्री अंकलेश्वर विद्यालय अकोले, हरणेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल कळस, आणि श्री बाबीर विद्यालय रुई या केंद्राचे असे एकूण 248 विद्यार्थी प्रविष्ट झाले
यामध्ये इयत्ता पाचवी चे 125 विद्यार्थी, इयत्ता आठवीचे 123 विद्यार्थी यांनी ही शिष्यवृत्ती परीक्षा दिली.यावेळी पाचवीचे केंद्र संचालक जगन्नाथ पाटील,आठवीचे केंद्र संचालक आप्पासो डोंबाळे,तसेच बैठे पथक म्हणून भालचंद्र शिंदे,(केंद्र समन्वयक),राजेंद्र खोमणे यांनी या साठी काम पाहिले तसेच इतर शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परीक्षा पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.अशाप्रकारे ही शिष्यवृत्ती परीक्षा सुनियोजित पद्धतीने पार पडली.