रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
समाजातला प्रत्येक घटक हा उत्सव प्रिय असतो. परंपरेनुसार अनेक उत्सव समाजात साजरे होत असतात. सध्याच्या काळात काही उत्सवांचे स्वरूप आक्राळ विक्राळ होत असले तरी आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याची मांडणी असलेला भुलाबाई उत्सव इतर उत्सवापेक्षा घरोघरी संस्कारक्षम पिढ्या तयार करण्याचे अविरत कार्य करतोय. आज कोजागिरी शरद पौर्णिमेनिमित्त महिना भर चाललेला ह्या भुलाबाई उत्सवाचा समारोप होत आहे.भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते शरद पौर्णिमेपर्यंत महिनाभर विदर्भातील घराघरात लोकजीवन, लोकसंस्कृती नि कृषी संस्कृतीचं दर्शन घडविणा ऱ्या भुलाबाईचा उत्सव हर्ष आंनदात साजरा होत असतो. बळीराजाच्या घरात हा काळ धान्यरुपी पीक येण्याचा काळ असतो. त्याचा आनंद ह्या उत्सवात दिसून येतो. चैतन्यदायी वातावरण ह्या काळात घरोघरी निर्माण झालेलं असते. भुलाबाई च्या उत्सवात विशेषत: कुटुंबातील मुली, स्त्रिया सहभागी होत असतात. भुलोजी आणि भुलाबाई यांचं संसारस्वप्न ते संसार गाडा या सर्वावर विदर्भात वऱ्हाडी बोलीभाषेत भुला बाईची अनेक लोकगीतं दररोज गायल्या जातात.
मुलींवर आदर्श संसाराचा संस्कार ह्या उत्सवाच्या माध्यमातून केला जातो. भुलाबाई उत्सवाच्या समारोप शरद पौर्णिमेला केल्या जातो. ह्या पौर्णिमे ला कोजागिरी किंवा माळी पौर्णिमा असेही म्हणतात. दुसऱ्या दिवशी परिसरा तील नदी वा विहिरीत भुलोजी व भुलाबाई ह्यांच्या मातीच्या मूर्ती पूजा विधी करून विसर्जित केल्या जातात. अनेक रूढी परंपरा पैकी शेकडो वर्षांपासून सुरु असलेला हा उत्सव आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याचे टोक बनला आहे. अशा ह्या सामाजिक व कौटुंबिक जबाबदारीचा संस्कार, भारतीय संस्कृतीचं रूप प्रदर्शीत करणाऱ्या उत्सवांची जपवणूक व्हायला पाहिजे. ग्रामीण भागात यासह सर्वच उत्सव आजही पारंपरिक रित्या साजरे होतात.
भुलाबाई उत्सव काळात गायल्या जाणारी गाणी मुलींच्या बालमनावर सम्यक विचारांचा परीघ तयार करत असतात. भविष्यात संसार गाडा यशस्वीपणे तिने चालवावा यासाठीची मांडणी सुंदर पद्धतीने ह्या उत्सवात केलेली दिसून येते. समाजात साजऱ्या हो णाऱ्या इतर उत्सवापेक्षा हा उत्सव घरोघरी संस्कार क्षम पिढ्या तयार करण्या चे अविरत कार्य करतोय. संस्कृती रक्षण व संस्कार रुजवणूक करणाऱ्या ह्या उत्सवात गायली जाणारी गिते कुणी लिहिली ठाऊक नाही. एका पिढी कडून दुसऱ्या पिढीच्या स्वाधीन केलेली ही सर्वांग सुंदर परंपरा आहे. लग्न झाल्या नंतर सासरी कसं वागायचं ह्याचे बाळकडू महिनाभर आंनदी वातावरणात मुलींना गीतांच्या माध्यमा तून सहज दिल्या जातात.
दोन दिवसापूर्वी शाळेतील सातव्या वर्गातील मुली स्वयंस्फूर्तीने भुलाबाईची गाणी म्हणत होत्या. त्यांच्या लय व तालबद्ध ह्या गीत रचना माझं मन भुतकाळात सर्रकन घेऊन गेल्या नि ह्या उत्सवाचे आमच्या घरातील चित्र डोळ्यापुढे उभे राहिले.
आम्ही नोकरीच्या गावी तेल्हारा तालुक्यातील दानापूर ला राहायचो. घरात आमची लेक प्रांजली लहान होती, तेव्हा भुला बाई उत्सव आंनदात साजरा व्हायचा. आम्ही उभयता कन्या शाळेत नोकरीला होतो. जिल्हा परिषदेची मुलींची शाळा असल्याने वर्गात सुद्धा मुलींच्या ह्या भुलाबाईच्या लोकगीतांचे गायन आम्ही करून घ्यायचो. प्रांजली सुद्धा आमच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत होती; त्यामुळे तिच्या सर्व मैत्रिणी महिनाभरआमच्या कडे भुलाबाईची गाणी म्हणायला यायच्या. संपूर्ण घर लेकरांनी भरून जायचं.गाण्यांनंतर भुला बाईचा प्रसाद वाटप व्हायचा त्याला खिरापत म्हणत. पण हा प्रसाद सहजासहजी वाटला जात नव्हता. भुलाबाईला दिला जाणारा नैवेद्य म्हणजे खिरापत, तो खायला सर्व मुलींना फार मजा यायची. मला रोज नवीन पदार्थ प्रसाद म्हणून लेकीच्या आग्रहाखातर आणून द्यावे लागत असत. या नैवेद्या मध्ये रोज नवा खाऊ मिळायचा. हा प्रसाद बंद डब्यात असायचा आणि प्रसाद काय आहे हे मुलींनाओळखावेलागायचे.त्यामुळे भुलाबाईची गाणी म्हटल्यावर खिरापत
जिंकणे म्हणजे डब्यातील प्रसाद ओळखणे ही एक अनोखी स्पर्धा महिनाभर रंगायची. खिरापत ओळ खून सांगायचं मुलींचं आकर्षण, कुतूहल मला अनोखा बालमहोत्सव वाटायचा. खिरापत ओळखण्याची एकमेकां मधली चढाओढ व येणारी रंगत कुठल्याही स्पर्धेपेक्षा कमी नव्हती. गाणी म्हटल्यानंतर, डब्यातील खिरापत डबा हलवून, वाजवून डब्यात काय खिरापत आहे हे भुलाबाई चे गाणे म्हणणाऱ्या मुलीं ना सूचक एखादा सुगावा सांगत. मग डब्यातील पदार्थाच्या हलण्याच्या आवाजावरून मुली डब्यात काय खाऊ आहे याचा अंदाज बांधत. एक एक पदार्थाचे नाव सांगत, सरते शेवटी कुणालाही खिरापत जिंकता न आल्यास डब्यात खिरापत काय आहे हे सांगितले जायचे. त्यावेळी आपली खिरापत कुणी जिंकलीच नाही याचा आनंदआमच्या प्रांजली ला फारसुखावाय चा तर एखाद्या मुलीने खिरापत जिंकून सांगितल्यास आपण एवढय़ा सर्व मुलींमध्ये जिंकल्याचा वेगळाच आनंद त्या मुलीला मिळायचा. गाणे संपल्या नंतर खिरापत पण गाण्यातच मागितली जायची.जसे ,बाणा बाई बाणा, सुरेख बाणागाणे संपले, खिरापत आणा।आणा आणा लवकर,
वेळ होतो आम्हाला
जाऊ द्या आम्हाला,
भुलाबाईचे गाणे म्हणायला
विदर्भ आणि मध्यप्रदेशात व इतर राज्यात असलेले मराठी कुटुंब भुलाबाई- भूलोजी यांच्या मूर्ती स्थापन करून सण साजरा करतात. अकोला जिल्ह्या तील अकोट येथे तर भुलजा भुलजी नावाचा चौक आहे त्याठिकाणी भुलजा भुलोजी उत्सव सार्वजनिक साजरा होतो, हिवरखेड येथे आसरा माता मंदिरात, दानापूर येथेही भुलजा भूलजी उत्सव कोजागिरी पौर्णिमे ला सार्वजनिक रीत्याभक्ती भावाने साजराहोतअसतो. विदर्भात अनेक जिल्ह्यात भक्तीपूर्ण वातावरणात हा उत्सव पारंपारिक पद्धतीने आजही साजरा होतो. आदर्श समाजाची निर्मिती करणारा हा उत्सव सार्वजनिक होतोय हे समाजाची दिशा योग्य मार्गांवर चालत असल्याची खूण आहे. रूढी परंपरे तील जे चांगलं ते जपल्या जायला पाहिजे. भारतीय कौटुंबिक व्यवस्थेची आदर्श निर्मिती करणाऱ्या ह्या उत्सवाचा समारोप सार्वजनीक रुपात उत्साहा त साजरा व्हायला पाहिजे. ज्यामुळे ह्या परंपरेचा प्रसार होईल.तुळशिदास खिरोडकार
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)