जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर : देश वैचारिकदृष्ट्या संपन्न आणि प्रगल्भ झाला पाहिजे हे प्राचार्य डॉ. सुरेंद्र बारलिंगे, प्रा. दि.य.देशपांडे, प्राचार्य हेमचंद्र धर्मधिकारी आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले या ध्येयवादी तत्वचिंतकाचे स्वप्न आणि ध्येय होते. यासाठी त्यांनी आयुष्यभर चिंतन व कार्य केले. तत्त्वज्ञान हा विषय सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचला पाहिजे, तत्त्वज्ञानामध्ये समकालीन समस्या संबंधी चिंतन झाले पाहिजे आणि तत्वज्ञानाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी केला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. या तत्वचिंतकांचे तत्त्वज्ञानामध्ये आणि समाज प्रबोधनामध्ये फार मोलाचे योगदान आहे. प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी या पुस्तकाच्या माध्यमात या तत्त्ववेत्त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कार्याचा एकत्रित परिचय करून देण्याचे फार मोलाचे कार्य केले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले.हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तत्वज्ञान विभाग व त्रैमासिक विचारशलाका, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील थोर इतिहासतज्ञ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. राजा दीक्षित हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाषचंद्र भेलके, प्रा.डॉ.श्रीधर आकाशकर आणि प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.डॉ.सदानंद मोरे यांनी महाराष्ट्रातील ध्येयवादी तत्त्वचिंतक या पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न झाल्याचे जाहीर केले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक डॉ.सुभाषचंद्र भेलके म्हणाले हे तत्त्वचिंतक देश व विदेशामध्ये परिचित होते. त्यांना जागतिक मान्यता होती. त्यांच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आणि मानवतावाद होता. तत्त्वज्ञानाचा उपयोग मानवी जीवन सुखी व संपन्न करण्यासाठी झाला पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे साम्राज्य निर्माण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विचार आणि जीवन दृष्टी दिली. त्यांनी समाजकारण व राजकारणाला सुस्पष्ट तात्विक बैठक देण्याचे कार्य केले. त्यांच्या जीवनामध्ये कार्य आणि तत्व यात भेद नव्हता. त्यांनी तार्किक व बुद्धीवादीदृष्टीने जीवनावर भाष्य केले. त्यांचे चिंतन सखोल व उंचीचे होते. त्यांनी तरुणांना व वयस्क व्यक्तींना देखील विचार करावयास, अभ्यास व संशोधन करण्यास प्रेरित केले. प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांनी त्यांच्यावर लेखन करून मोठे काम केले आहे. या पुस्तकातून वाचकांना विचाराचे बीज मिळतील, त्यांची जिज्ञासा जागृत होईल आणि ते लेखनास प्रवृत्त होतील अशी आशा आहे, असे ते शेवटी म्हणाले.अध्यक्षीय समारोप करताना महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ.राजा दीक्षित म्हणाले की, प्रा.डॉ.सदानंद मोरे व डॉ.सुभाषचंद्र भेलके यांनी या ध्येयवादी तत्त्वचिंतका संबंधी सखोल व सविस्तर विचार मांडलेले आहेत. त्यातून आपल्याला त्यांचे किती मोठे योगदान आहे हे लक्षात येते, त्यांचे महाराष्ट्राच्या तात्विक आणि वैचारिक जडणघडणीमध्ये फार मोठे योगदान आहे. ते सर्व नामांकित प्राध्यापक व तत्त्वचिंतक होते. ते पुढे म्हणाले की, इतिहासाचा अभ्यासक हा तत्वज्ञानाचा अभ्यासक असतो म्हणून मी इतिहासाचा विद्यार्थी असूनही मला तत्त्वज्ञानामध्ये आस्था आहे. अविचारावर मात करण्यासाठी या विचारवंतांचे विचार हे उपयुक्त आहेत. महाराष्ट्रामध्ये कृतीशिल विचारवंतांची परंपरा क्षीण होत असताना प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार हे विचारशलाकाच्या माध्यमातून मोलाचे कार्य करीत आहेत, ते सामाजिक बांधिलकी आणि ज्ञाननिष्ठा अशा दुहेरी भूमिकेतून कार्यरत आहेत प्राचार्य डॉ.कुंभार हे चालती बोलती संस्था आहे. त्यांनी सुरू केलेली समाज शिक्षण पुस्तिकामाला महाराष्ट्राचा विचार विश्वामध्ये मोठे योगदान देणार आहे.या कार्यक्रमाला प्रा.डॉ.प्रदीप गोखले, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.चंद्रकांत धर्माधिकारी,प्रा.डॉ.श्रीधर आकाशकर, डॉ.सुनील राऊत, (पुणे), प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, (मुखेड), रवींद्र घोडजकर, (वाई), डॉ.बाळासाहेब मुळीक, (अकलूज), प्रा.ई.आर.मठवाले, प्राचार्य डॅा.हरिदास फेरे, प्राचार्य डॉ.वामन पाटील, प्रा.काशिनाथ पांडे, डॉ.सुनील भोईटे, (शिरूर), प्रा.उत्तम बावणे, प्रा.सुधाकर कुलकर्णी, नितीन कुंभार, डॉ.सुनंदा भुसारे, अलका जेवळीकर व डॉ.श्रीपाल देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले, प्रास्ताविक डॅा.अनिल जायभाये यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांनी मानले.या कार्यक्रमाला डॉ.संजय गवई, डॉ.विवेक घोटाळे, डॉ.अनिल जायभाये, प्रा.शिवाजी पाटील, प्रा.आशिष स्वामी, शितल स्वामी, किरण कुलकर्णी, प्रा.नागेश जाधव व राहुल लोंढे आदिंनी यांचे बहुमोल सहकार्य लाभलेया कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील संचालक, प्राचार्य, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते