पवन मनवर
तालुका प्रतिनिधी यवतमाळ
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, या जयघोषातच प्रतिवर्षी महाराष्ट्र दिनाला सळसळत्या उत्साहात आणि चैतन्यमयी वातावरणात सुरुवात होते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपले बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृती महाराष्ट्र दिनी जागवल्या जातात. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी शेकडो लोकांनी आपले प्राण वेचले. महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र सर्वच बाबतीत देशभरात आघाडीवर आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. 1 मे याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.