अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव : समता परिषदेचे जिल्हा सचिव, विठ्ठल भागवत यांनी आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन व मेडशी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू करा अशी मागणी समता परिषदेच्या वतीने जिल्हा आरोग्यअधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे समता परिषदेचे जिल्हा सचिव विठ्ठल भागवत यांनी ता 24 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले .निवेदनात म्हटलेआहे की मेडशी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात पूर्वी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होत होत्या .नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यावर त्या बंदकरण्यात आल्या आता नवीन इमारतीमध्ये रुग्णालयाचे काम सुरू आहे त्यामुळे आता येथे कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया सुरू करावी सध्या संबंधितांना शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेगाव ,मालेगाव वाशिम जावे लागते त्यांची गैरसोय होवू नये यासाठी इथे कुटुंब शस्त्रक्रिया सुर करण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर विठ्ठल भागवत यानी केली आहे.निवेदन देतेवेळी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष अरविद गाभणे ,चंद्रकात गायकवाड , गोविदराव राऊत आदिचा समावेश आहे.