सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
खरीपातील पीके काढणीला सुरूवात होणार आहे. पंरतु अद्यापही वाशिम जिल्ह्य़ासह राज्यातील अनेक भागातील शेतकरी आजही पीककर्जापासुन वंचित आहेत. ‘भिक नको कुत्रे आवर’ आसे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीपातील पीक पेरण्यासाठीचे पीककर्ज अद्यापही जिल्ह्य़ातील अनेक शेतकर्यांना मिळाले नाही. यामध्ये बहुतांश नविन तर काही जुने खातेदार शेतकरी आहेत. आॅगष्ट महिना संपत आला. खरीपातील लवकर येणारी पीके मुग, उडीद, सोयाबीनच्या लवकर येणार्या जाती पक्व होण्याचा अवस्थेत आहेत. लवकरच खरीप पीक काढणीचा हंगाम सुरू होणार आहे. पंरतु जिल्ह्य़ातील अनेक शेतकरी मात्र बँकांच्या आडमुठे पणा आणि प्रशासनाच्या कचखाऊ प्रवृत्तीमुळे’ पीककर्जापासुन वंचित आहेत. ज्या प्रमाणे 31 मार्च हि पीक कर्ज भरण्याची अंतीम तारीख आहे. किंवा त्यानंतर पीककर्ज भरणार्या शेतकऱ्यांना पीककर्जावर व्याज माफी मिळत नाही. त्याच प्रमाणे पीककर्ज वाटपाची निश्चित एक तारीख आसावी त्या तारीखे नंतर बॅकावर कारवाई करण्यात यावी आसे धोरण आसले पाहिजे.या बाबत राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव साहेब ठाकरे यांना भूमिपुत्र कडुन पत्र दिले असल्याचे भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी सांगीतले. जिल्ह्य़ातील पीक कर्ज वाटपाचा अढावा जिल्हाअधिकारी व अग्रणी बॅक व्यवस्थापकांनी घेऊन पीककर्ज वाटपास टाळाटाळ करणार्या बॅक शाखा व तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती भूमिपुत्र कडुन करण्यात आली आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)