अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी : वन परिक्षेत्रातील शेतकरी ह्यांचे मागील वर्षी ऑक्टेंबर,नोव्हेंबर,डिसेंबर ह्या महिन्यात तुर,हरभरा उभ्या पिकाचे जंगलातील हरीण,रोही,रानडुक्कर ह्या वन्य प्राण्यांच्या कडून आतोनात नुकसान झाले होते.सदर पिकाचे तात्काळ पंचनामे वन विभागाचे कडून केल्या गेले होते व नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गाला फुल ना फुलाची पाकळी नुकसान भरपाई आर्थिक स्वरूपात मंजूर पण केली गेली.मात्र ती रक्कम अद्यापही मेडशी वन परिक्षेत्रातील काही शेतकरी वर्गाला मिळाली नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.वन्य प्राण्यांच्या कडून जंगला लागत शेती असलेल्या शेकाऱ्याचे पिकाचे नुकसान हे मर्यादा ओलांडून होत असते.वनात वाढलेली वन्य प्राण्यांची संख्या आणि त्यावर नसलेले वन विभागचे कसलेच नियंत्रण व मुख्य म्हणजे कायदे आणि योजना असताना सुद्धा वन विभागाकडून जंगल लागत शेती असलेल्या शेतकरी वर्गाला सौर-तार कुंपण योजना किंवा जैविक शेती कुंपण साठी अनुदान देऊन त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून उपाय योजना केल्या जात नाही. आणि नुकसान भरपाई पण ही योग्य वेळेत दिली जात नाही.त्यामुळे वन विभागाचे गलथान कारभार मुळे मेडशी मधील जंगला लागत शेती असलेला शेतकरी नाहक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करत आहे.
चौकट
वन्य प्राण्यांच्या कडून नुकसान झाल्या नंतर 48 तासात तक्रार करणे आम्हाला बंधनकारक आहे.वन विभागाला नुकसान भरपाई देण्यासाठी मर्यादा असून अद्यापही मदत मिळाली नाही – अजिंक्य मेडशीकर(शेतकरी मेडशी)