विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : तालुक्यातील धानोरा गावामध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे मान्सूनपूर्व करण्याची साफसफाई अद्यापही केलेली नाही आज रोजी 10 जून असून ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचे नालेसफाई व गावातील साफसफाई केलेली नाही त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये सेफ्टीच्या आळ्या जात असल्याचे तक्रार नागरिक करत आहेत आणि एखादा मोठा पाऊस झाल्यानंतर नालितील पाणी काही ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा फिरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होईल त्यामुळे ग्रामपंचायत ने लवकरात लवकर नालेसफाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे मागील सत्ताधारी लोकांनी गावातील विकास केला नसल्याचे बोलले जात होते पण आता असे बोलले जात आहे सत्तेत आल्यानंतर सर्वजण सारखेच असतात फक्त निवडणुका जिंकण्या पुरते लोकांना खोटे आश्वासने दिली जात आहेत आणि गावाचा कोणता तरी विकास होईल या उद्देशाने गावकऱ्यांनी सत्ता बदल केला होता पण नागरिकांच्या समस्या जैसे ते आहेत यामुळे जनतेमधून नाराजीचे सुर उमटत आहे गावामध्ये विजेचा प्रश्न गंभीर बनला असून त्यावर संपूर्ण उन्हाळा उलटला असला तरी काही उपाय योजना करण्यात आली नसून नागरिक मात्र परेशयनीचा सामना करत आहेत आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना पूर्ण वेळ सुविधा मिळत नसून त्यावर सुध्धा कोणतीही कारवाई केली नाही यनाऱ्या काळामध्ये गावचे सरपंच प्रकाश जाधव उपसरपंच अवधूत हामंड या सर्व गोष्टी चा विचार करून सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)