अकोला : राज्यातील पोलिसांची रिक्त असलेली पदे १०० टक्के भरण्याला शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील ११ हजार ४४३ पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना महामारीमुळे राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्ष कोणतीही पोलिस भरती झाली नव्हती. राज्यभरात लाखो युवक पोलिस भरतीची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय आहे. या पोलिस भरतीमध्ये पोलिस शिपाई संवर्गामध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलिस शिपाई अशी पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदे वगळता जिल्ह्यात ३५० पोलिसांची पदे रिक्त आहेत. शासनाने १०० टक्के पदे भरण्यासाठी मान्यता दिल्यानंतर आता पूर्ण ३५० पदे भरली जाणार आहेत. पोलिस भरतीची प्रक्रिया राबवण्यात येईल व १०० टक्के म्हणजेच ३५० पोलिसांची पदे भरली जातील, अशी माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)