सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी,मुर्तिजापूर
मूर्तिजापूर : येथील शहर हे दोन विभागात वसलेले आहे.स्टेशन विभाग आणि जुनी वस्ती असे दोन विभागात हे शहर वसलेले आहे.या दोन्ही विभागात नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने पाणी पुरवठा केला जातो.पण ज्या गोयंका नगर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरुन शहराला पाणीपुरवठा केला जातो ते ती पिण्याच्या पाण्याची टाकी अनेक दिवसांपासून स्वच्छ केल्या नसल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वारकाप्रसाद रामदास दुबे यांनी राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे दि.24 ऑगस्ट रोजी केली आहे.मूर्तीजापुर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात अनेक नागरीकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.सध्या पावसाळयाचे दिवस असल्यामुळे विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.सरदी,खोकला, थंडी वाजून ताप,डोके दुखी,शुगर,बिपि असे अनेक आजारांना नागरिकांना खाजगी रुग्णालयात जाणे शिवाय पर्याय राहीले नाही आहे. शासकीय रुग्णालयात देखील जागा अपुरी पडत आहे.नगर पालीका पाणी पुरवठा पुरवठयाशी संबंधित प्रश्न प्रशासनाने तात्काळ सोडविण्यात यावे अशी मागणी एका तक्रारी द्वारे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वारकाप्रसाद रामदास दुबे यांनी केली आहे.मूर्तीजापुर शहराला पाणीपुरवठा करणारी टाकी मागील पाच वर्षांपासून स्वच्छ केली नाही.हया टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ व पावडर जमा झाले आहे.त्यामुळे शहरातील अनेक भागात गढुळ दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा केला जातो आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील टाकी देखील स्वच्छ करणे गरजेचे झाले आहे, घरकुल परीसरातील टाकी असल्याची माहिती मिळाली आहे.मूर्तीजापुर शहराला मागील सन 1975 पासुन नगर परिषद प्रशासनाचे वतीने पाणी पुरवठा केला जातो आहे.ही टाकी अत्यंत जिर्ण व जिवघेण्या योग्य झाली आहे.त्या पिण्याच्या पाण्याची टाकी नवीन निर्माण करण्यात यावी,गोयंका नगर येथुन शहराला पाणीपुरवठा केला जातो टाकीतून वाया जाणारे पाणी याची पाईप लाईन चोक अप आहे.ती साफसफाई करणे गरजेचे आहे.पाईप लाईनवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिकेजेस असल्यामुळे दररोज हजारो गॅलन पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे.गोयनका नगर ते जुनी वस्ती मोरारजी चौकापर्यंत नविन पाईप लाईन टाकण्यात आली आहे.ती सुरू करण्यात यावी,प्रभाग क्र. सहा पंचशील वाडी ते मातंगपुरा येथे पाईप लाईन टाकण्यात यावी.अशा विविध प्रकारच्या मागण्याचा निवेदनात समावेश आहे वरील सर्व प्रश्र्न नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया ताई टवलारे मॅडम यांनी सोडवाव्यात अशी मागणी करणारे एक निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहीते, मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया टवलारे, आमदार हरीष मारोती आप्पा पिंपळे यांना देण्यात आली आहे.