नागरिकांनी मास्क घालून घराबाहेर निघावे मुख्याधिकारी अजय साळवे यांचे आवाहन.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी :- जिल्हामध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असल्याने नगर पंचायत प्रशासन अहेरी कडून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.मास्क परिधान न करणाऱ्या ५५ लोकांवर जवळपास ५ हजार ५०० रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे.मागील काही दिवसांतच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.तरीही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी,खासगी, सरकारी कार्यालयांमध्ये,बाजारपेठांत मास्कचा वापर होत नसल्याची स्थिती आहे.नागरिकांमध्ये अजूनही कोरोनाबाबत गांभीर्य नसल्यामुळे नगर पंचायतचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या मार्गर्शनाखाली स्वच्छ्ता निरीक्षक अभय ढोरे,लिपिक श्रीकांत गुनालवार यांनी ५५ लोकांवर कारवाई करत ५ हजार ५०० रुपयांची दंड वसूल केले आहे.दि.7 जानेवारीच्या सकाळ पासूनच शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा अशा ठिकाणी नगर पंचायत प्रशासनाचे कर्मचाऱ्यांकडून मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून आले.कोरोना संसर्गाची लाट अजूनही संपलेली नाहीं राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामूळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मास्क,सेनिटायझर आणि सामजिक अंतर राखून घराबाहेर निघावे अन्यथा विनामास्कने फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी दिली.