अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दिल्ली व उच्च न्यायालय मुंबई तथा महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांकरीता चित्रकला,निबंध लेखन, स्लोगन अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून या स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक विद्यालय पातुरची विद्यार्थिनी कु.श्रुती विजय कांबळे हिने अकोला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला तसेच कु.सृष्टी विजयसिंह राठोड हिने जिल्ह्यातून प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त केले असून त्यांचा नुकताच विद्यालयात आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कु.श्रुती कांबळेला मान्यवरांच्या हस्ते 2000 रुपयाचे रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच विद्यालयातील स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.श्रुतीने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. रामसिंगजी जाधव व आपल्या शिक्षकांना दिले. श्रुतीला कला शिक्षक श्री.सी. ए. वाघ यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले.या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य.एस.एम.सौंदळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. रूपाली राऊत तसेच पी.जे राठोड, ए.व्ही.सोनटक्के आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.टी.गाडगे यांनी केले तर, मान्यवरांचे आभार प्रा.एस .बी. आठवले यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा.जे.डी.भारस्कर, प्रा.व्ही आर थोरात, प्रा.आर एम बचाटे,जी एन राऊत, सी.ए वाघ, सौ.आर. ए. जाधव, सौ.के.डी. लोखंडे, सौ.आर एस. देशमुख, एस. एस.जाधव, एस.बी पोहरे, बी.बी राठोड, जे.के खुळे,पी. एस. शेगोकार,डी.जे राजनकर, व्ही.डी राठोड,श्रीमती बी.बी आडे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)