अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त आयोजीत ॲानलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हनुन बोलतांना संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी वरील प्रतिपादन केले. दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॅा.एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय, पातुर जि. अकोला आणि यशवंत महाविद्यालय सेलु जि वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत ‘भारतीय संवीधान आणि लोकशाहीची वाटचाल’ या विषयावर एक दिवसीय ॲानलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये उद्घाटक म्हनुन बोलतांना दिलीपबाबू इंगोले म्हणाले की, जगातील सर्वात महाण अशी लोकशाही आपल्याला भारतीय संवीधानातुन मिळाली आहे. देशातील प्रत्येक समस्येचे समाधान संविधानात आहे. शिक्षणमहर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे मोलाचे योगदान संविधान सभेत होते यांवर आपण अभ्सास करणे गरजेचे आहे. डॅा.बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांचे वैचारीक अधिष्ठान आपण समज़ुन घेणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन करुन चर्चासत्राचे उद्घाटन झाले. असे त्यांनी रितसर जाहीर केले. आणि ॲानलाईन राष्ट्रीय चर्चासत्राच्या स्मरणीकेचे प्रकाशन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॅा. के. एस. खंडारे यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी एक दिवसीय ॲानलाईन राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. आजच्या देशातील सद्य परिस्थिती लक्षात घेता संविधान किती महत्वाचे आहे यामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली.उद्घाटकीय सत्राच्या अध्यक्षस्थानी यशवंत महाविदयालय सेलु च्या प्रभारी प्राचार्या डॅा.अर्चना डहाणे ह्या होत्या अध्यक्ष म्हणुन बोलतांना त्या म्हणाल्या की, देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करणे आज काळाची गरज बनली आहे. लोकांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा हा उद्देश प्रत्येक शैक्षणीक संस्थेचा असला पाहीजे असे प्रतिपादन केले.उद्घाटकीय कार्यक्रमाचे संचालन डॅा.संदीप काळे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा अतुल विखे यांनी केले.पहिल्या सत्राचा विषय ‘भारतीय संविधानातून आविष्कृत लोकशाहीचे प्रारूप’ असा होता यावर मार्गदर्शन करतांना बिंझाणी सिटी कॅालेज नागपुर चे उप- प्राचार्य डॅा.संदीप तुंडुरवार म्हणाले की,भारतीय संवीधान हे फ्रेंच राज्यक्रांती मधुन नाही तर तथागत बुध्दांनी सांगितलेल्या मानवी कल्याणाच्या मुल्यांतुन तयार झाले आहे.म्हनुन चं आज ७५ वर्षानंतर देखील आपण एकसंघ आहोत.यासाठी त्यांनी जगातील विविध महापुरुषांची उदाहरणे दिली. देशातील कृषी कायदे मागे घेणे हा संवीधानाचा विजय आहे. संविधान जीवंत आहे तोपर्यंत लोकशाही जीवंत राहील असे प्रतिपादन त्यांनी केले.अध्यक्षीय भाषन एस.एन. कॅालेज खंडवा मध्य प्रदेश येथील विभाग प्रमुख डॅा.शुची गुप्ता यांनी केले त्यांनी सांगितले की,देशात राहणार्या सर्व धर्माच्या लोकांमध्ये एकता, समानता असावी आणि सर्व लोकांना कोणताही भेदभाव न करता त्यांचे हक्क मिळावेत म्हणून संविधान बनवले गेले.संविधान भारतातील सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समानता सुरक्षित करते आणि लोकांमध्ये बंधुभाव वाढवते.असे प्रतिपादन केले. पहिल्या सत्राचे संचालन प्रा दादाराव गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन डॅा अनंत रिंढे यांनी केले.समारोपीय सत्राच्या प्रमुख अतिथी डॅा. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती च्या प्राचार्या डॅा.वर्षा देशमुख ह्या होत्या आपल्या वेगळ्या शैलीतुन पिपिटी द्वारा मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगीतले की,देशाचा विकास मोजण्याचा मापदंड महिलांच्या प्रगतीवर अवलंबुन असतो असे डॅा. बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. हाच आधार घेवुन आज महिलांनी संविधानाच्या माध्यमातुन आदर्श घेवुन जीवनात वाटचाल करावी. देशावर येणार्या संकटप्रसंगी सारे भारतीय, सारे भेद विसरून एकत्र येतात. ही ताकद आपल्या भारतीय संविधानाचीचं आहे. संविधानामुळेचं देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. असे प्रतिपादन केले.समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर यांनी अध्यक्षीय भाषनात भारतीय संविधानाच्या विविध वैशाष्ट्यांवर प्रकाश टाकला. संविधानाने दिलेले मुलभूत अधीकार, कर्तव्ये, जबाबदारी यांचे सविस्तर विवेचन केले. लोकशाहीला लोकाभिमुख करण्यासाठी संविधानाचा आधार घेणे गरेजेचे आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक आहे.जे आपल्याला आर्थिक आणि वैयक्तिकरित्या मजबूत बनवते.देशाला एकता आणि विकास क्षमता प्रदान करते. भारतीय संविधानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे प्रतिपादन केले.समारोपीय सत्राचे संचालन डॅा.दिपाली घोगरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रभारी प्राचार्य डॅा. के.एस.खंडारे यांनी केले. या चर्चासाठी देशभरातील विविध राज्यातुन विविध महाविद्यालयातील अभ्यासक, संशोधक व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.