एसटी कर्मचारी विलिनीकरणावर ठाम
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : राज्य शासनाकडुन एसटी कर्मचाऱ्यांना भरघोष पगारवाढ दिल्यानंतरही कर्मचारी कामावर परतले नाही.त्यामुळे शनिवार दि.27 नोव्हेबर रोजी गडचिरोली विभाग अंतर्गत येणारे सुमारे 133 कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.यात 90 कर्मचाऱ्याना निलंबित करण्यात आले आहे.तर 43 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती केली आहे.राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याविषयी सकारात्मक निर्णय घेत मुळ वेतनात अडीच ते पाच हजारांची वाढ केली आहे.मुळ वेतनात वाढ झाली असल्यामुळे प्रत्यक्ष मिळणारे वेतन पुन्हा यापेक्षा जास्त राहणार आहे.वेतनवाढ मिळाल्यानंतर एसटी कर्मचारी कामावर येतील.अशी अपेक्षा जनतेकडुन व्यक्त केली जात होती.माञ बसेस कर्मचारी विलीनीकणाच्या मागणीवर ठाम आहेत.दि.24 नोव्हेबर ला एसटी कर्मचारीची पगारवाढीची घोषणा झाल्यानंतर 25 नोव्हेबर पासुन कर्मचाऱ्यानी कामावर परतने अपेक्षित होते.माञ गडचिरोली विभागाअंतर्गत येणारे अहेरी,गडचिरोली व ब्रम्हपुरी या तीनही आगारातील एकही कर्मचारी कामावर परतले नाही.गडचिरोली विभाग नियंञकांनी या कर्मचाऱ्यांशी पगारवाढ झाली असल्याने संप मागे घ्यावा.अशी विनंती केली होती.माञ कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम होते.पगारवाढीनंतर सुद्धा कर्मचारी कामावर हजर न झाल्याने त्याच्यावर कारवाई करणे आवश्यक झाले होते.त्यामुळे 27 नोव्हे रोजी 90 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर 43 जणांची सेवा समाप्ती केली आहे.गडचिरोली विभागात आतापर्यंत झालेल्या एकुण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 143 तर सेवा समाप्त झालेल्यांची संख्या 67 झाली आहे.असे एकुण 210 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे.