सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
अहेरी : पुरुष प्रधान देशात संविधानामुळेच महिलांना आत्म सन्मान व बळ मिळाले असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांनी केले.त्या 26 नोव्हेंबर रोजी स्थानिक भगवंतराव महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित संविधान दिन व संविधान वाचन कार्यक्रमात उदघाटनीय स्थानावरून बोलत होत्या.कार्यक्रमात अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य विष्णू सोनोणे,प्राचार्य श्रीधर चौधरी,रा.काँ.चे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,रा.काँ. तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष महेश अलोने,महिला तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार,ममता पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर आणि संविधान प्रास्ताविके समोर दीप प्रज्वलित करून व पुष्पअर्पण करून अभिवादन करण्यात आले. उदघाटनीय स्थानावरून पूढे बोलतांना शाहीन भाभी हकीम म्हणाल्या की,देशात विविध जातीचे व धर्माचे नागरिक असून संविधानामुळेच गुण्यागोविंदाने नांदत आहेत. खास करून समस्त स्त्री भगिनींसाठी संविधानात महत्व देण्यात आले असून आज महिला विविध क्षेत्रात पारंगतांना दिसत आहेत.संविधानामुळेच देश टिकला असून एकसंघपणा आहे.एकात्मता व सर्वधर्मसमभावाची झालर संविधानात असून संविधानामुळेच भारत देश महान असून संविधानाची खरी जपवणूक आणि संविधानाचे महत्त्व व जाणीव जागृती करणे काळाची गरज असल्याचे म्हणत संविधानाचे महत्त्व यावेळी शाहीन हकीम यांनी पटवून दिले.तर अध्यक्षीय स्थानावरून रवींद्र वासेकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा व देशात वास्तव्य असणाऱ्या सर्वधर्मीय लोकांचा विचार करून जीवन जगण्याची चौकटी व शैली ठरवून दिल्याने देशाची अखंडता व एकात्मता टिकून असून देशात 15 आगष्ट स्वातंत्र्य दिन,26 जानेवारी प्रजासत्ताक दिन त्या प्रमाणे 26 नोव्हेंबर संविधान दिन राष्ट्रीय सन म्हणून साजरा करण्याची गरज असल्याचे म्हणाले.याच प्रसंगी प्राचार्य विष्णू सोनोणे यांनी,समतेचा,स्वातंत्र्याचा,धार्मिक स्वातंत्र्याचा,शैक्षणिक हक्क , सार्वजनिक सुव्यवस्था,नित्तीमता संविधानात अंतर्भूत असून संविधानात नागरिकांना व नौकर वर्गांना हक्का बरोबरच कर्तव्याची जाणीव करून दिले असल्याचे म्हणत संविधानच देशाला तारणहार ठरत असल्याचे आवर्जून सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल गर्गम यांनी तर संविधानाचे उद्देशिकाचे वाचन आणि सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले.उपस्थितांचे आभार अमोल अलोने यांनी मानले.कार्यक्रमात रा.काँ.चे कार्यकर्ते, प्रतिष्टीत नागरिक व मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.