अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर : स्थानिक डॉ.एच.एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातूर येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. खंडारे होते. तर विचारपीठावर कला शाखा विभाग प्रमुख डॉ. व्ही जी. वसु, वाणिज्य शाखा विभाग प्रमुख प्रा. एच. ए. एकबोटे, विज्ञान शाखा विभाग प्रमुख डॅा. संजय खांदेल, प्रा.दादाराव गायकवाड, ग्रंथपाल प्रा.अतुल विखे, डॅा. रोनील आहाळे, प्रा. राहुल माहुरे, डॅा. अनिल देशमुख, प्रा नलिनी खोडे, उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेचे जेष्ठ सदस्य शिक्षणमहर्षी भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. आणि विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशीकेच्या १०० प्रतींचे वाटप करण्यात आले. तसेच 26/ 11 ला झालेल्या दहशतवादी हल्यातील शहिदांना आदरांजली देण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.के. एस. खंडारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांत किरण भारतीय संविधाना मधील मूलभूत कर्तव्य कोणती आहेत. त्याचे महत्त्व आणि जीवन जगताना ते अमलांत कसे आणायचे या संदर्भामध्ये सविस्तर असे मार्गदर्शन करतांना सांगितले की, भारतीय संविधाना मधील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करावे हाचं यशाचा मार्ग आहे. संविधानामुळे भारतीय नागरिकांना आपले हक्क आणि अधिकार मिळाले. या संविधानामुळे आपल्याला स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिक असल्याची भावना निर्माण होते. संविधानात दिलेले मुलभूत अधिकार आपली ढाल बनून आपल्याला हक्क देतात. त्याचप्रमाणे यामध्ये दिलेल्या मुलभूत कर्तव्य आपल्याला जबाबदारीची जाणीव करुन देतात. असे प्रतिपादन केले. यानंतर विद्यार्थ्यांसाठी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधानावर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजीत करण्यात आली. उद्देश्य असा की, संविधानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी. महाविद्यालयातील विविध सूचना बोर्ड वर संविधानाच्या उद्देशीकेच्या प्रती लावण्यात आल्या त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. के एस खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरविंद भोंगळे तर आभार प्रदर्शन प्रा.उज्वला मनवर यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालया मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.