सलीम शेख
तालुका प्रतिनिधि एटापल्ली
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील तालुका एटापल्ली येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन या आयोजित कार्यक्रमात प्रमुख उद्घाटक रियाज शेख, जिल्हा प्रमुख, अहेरी विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, विलास कोडापे, सह संपर्क प्रमुख गडचिरोली, प्रमुख पाहुणे म्हणून अरुण धुरवे, उप जिल्हा प्रमुख (शहर) बिरजू गेडाम उप जिल्हा प्रमुख (ग्रामीण) महिला आघाडी उप जिल्हा संघटीका, पौर्णिमा इस्टाम, दिलीप सुरपाम ,युवा सेना (प्रभारी) अधिकारी अहेरी विधानसभा, माजी जिल्हा प्रमुख, राजगोपाल सुलवावार, जिल्हा नियोजन समिती सदस्य, दिवाकर भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली, मनीष दुर्गे, तालुका प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी फित (रिबीन) कापून कार्यालयाच्या उद्घाटन केले या प्रसंगी फटाके फोडून आतिषबाज करण्यात आले व “जय भवानी जय शिवाजी” आवाज कोणाचा शिवसेनेचा,, शिवसेनेचा विजय असो,, असे घोषणाबाजी करीत मोठ्या थाटाने कार्यालयाच्या उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रास्ताविक भाषण मनीष दुर्गे यांनी जन सामान्य जनतेचे सेवे साठी त्यांचे प्रश्न सोडविण्या साठी कार्यालयाची स्थापना करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख, रियाज शेख संबोधन करताना मा.ना. उध्दव ठाकरे साहेब, शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र राज्य नाही भारत देशा मध्ये शिवसेनेचा उत्कृष्ठ कार्या बद्दल चर्चा होत आहे मा.ना. उध्दव ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक पक्षाचे लोक, युवक, महिला शिवसेनेत प्रवेश करीत आहे. रियाज शेख यांनी हीच ती वेळ सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक कामात लागावे आणि समोर येणाऱ्या नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना भगवा फडकवलाच पाहिजे. या जन संपर्क कार्यालयाच्या माध्यमाने गोर गरीब लोकांना न्याय मिळवून द्या, प्रत्येक गावागावात जन संपर्क अभियान राबवून धनुष्य बाण चिन्ह पोहचायला पाहिजे सोबतच गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक असे संकल्प घेऊन कामाला लागावे असे रियाज शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी अध्येक्षिय मार्गदर्शनात विलास कोडाप, यांनी एटापल्ली तालुक्यात शिवसेना जन संपर्क कार्यालयाची अत्यंत आवश्यता होती कारण या दुर्गम भागात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालयाची भूमिका प्रथम राहील सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक कार्यालयात वेळ देऊन लोकांचे प्रश्न सोडवा. याच कार्यालयाच्या माध्यमाने समाज सेवा करावी जन सेवा हीच ईश्वर सेवा एटापल्ली तालुक्यात शिवसेना जन संपर्क कार्यालय स्थापना केल्याने नक्कीच जनतेचे प्रश्न सोडविण्याची सुवर्ण संधी शिवसैनिकांना प्राप्त झाली आहे. असे मत व्यक्त केले. तसेच उप जिल्हा प्रमुख, अरुण धूरवे, माजी प्रमुख, राजगोपाल सुल्वावार, पौर्णिमा इस्टाम्म यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले. संचालन, राघव सुल्वावार, युवा सेना उप जिल्हा, अधिकारी (प्रभारी) यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी एटापल्ली नगर पंचायत अंतर्गत प्रभाग निहाय, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, बी.एल. ए. यांची नियुक्ती करण्यात आली. सदर कार्यक्रमात, राहुल आदे शहर प्रमुख, महेंद्र सुल्वावार, युवा सेना शहर प्रमुख, मनीष इस्टाम, युवा सेना तालुका, अधिकारी भामरागड, सलीम शेख, अक्षय पुंगाती, निहाल कुभारे, सूरज वेलादी, मोहित दुर्गे, सुजल बघमारे, सुमित खन्ना, सुजल दुर्गे, अरूनाताई निकोडे, पवण चीत्यालवार, शेतंनु उईके, अमीर शेख, हर्षद शेख, रोहित घोष, प्रस्नित करमरकर, रमा नरोटे, पुष्प पुसाली, अनिकेत हीचामी, तेजा गुज्जलवार , रूपा पुसाली, सरिता कोट्रांगे,सम नारोटे, अनिकेत मामाडीलवार, असे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.