सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
आरमोरी-: जिल्ह्यातील प्रमुख महत्त्वाची शिवसेनेची पदे संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांनी वेळोवेळी बंडखोरी करणाऱ्या आणि पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांना वाटली त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली. तात्काळ संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांच्या हकालपट्टीची एक मुखी मागणी आज आरमोरी येथील शिवसेनेच्या आढावा बैठकीत करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की,प्रीती आदिवासी आश्रम शाळा येथे दिनांक 28 ऑक्टोंबर 2021 रोजी आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती आणि नगरपरिषद,नगरपंचायत च्या निवडणुकीच्या संदर्भाने आढावा बैठकीत घेण्यात आले.या आढावा बैठकीमध्ये अनेक ज्येष्ठ शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते या पदाधिकाऱ्यांच्या मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की गडचिरोली जिल्ह्याची शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशोर पोद्दार हे जेव्हापासून जिल्ह्यात येतात शिवसैनिकात गटबाजी निर्माण करतात महत्त्वाचे पद देताना शिवसेना विदर्भ प्रमुख गजानन कीर्तिकर यांचे नाव समोर करून पदासाठी पैसे मागतात व किरतीकर साहेबांची बदनामी केली.ज्या लोकांनी पैसे दिले त्यांना ते पदे बहाल करतात.गडचिरोली जिल्ह्यातील काही दारू विक्रेत्यांना सुद्धा या आधी पदे बहाल करण्यात आलेले आहेत त्यामुळे पक्षाची सुद्धा बदनामी झालेली आहे.जिल्ह्यातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांसोबत असभ्य भाषेत भाष्य करतात.उपजिल्हा प्रमुख भरत जोशी हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पेपरमधून निष्क्रिय पालकमंत्री यांना आवरा म्हणून जाहिर विरोध केला आहे. यामागे सुरेन्द्र सिंह चंदेल व पोतदार यांचा हात राहीला आहे.कारण चंदेल आणि पोतदार पालकमंत्री यांचे बाबतीत विरोधात लिखान केल्यानंतर ही भरत जोशी याला समर्थन दिले आहे.वगैरे यामुळे पुढे होणाऱ्या निवडणुकीवर विपरीत परिणाम होणार असल्याने निवडणूक पूर्व म्हणजे निवडणुकीच्या आधीच किशोर पोतदार यांची संपर्क प्रमुख पदावरून तात्काळ हकालपट्टी करून नवीन संपर्कप्रमुख जो गटबाजी न करणारा कार्यकर्त्यांना धरून राहणारा असा संपर्कप्रमुख या जिल्ह्याला देण्यात यावा.अशी मागणी एकमुखी आरमोरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याआधी सुद्धा किशोर पोतदार यांनी सुरेंद्र चंदेल सारख्या व्यक्तीला वेळोवेळी पक्ष बदलून बंडखोरी करणाऱ्या अशा व्यक्तीला जिल्हाप्रमुख पदासाठी पोतदार यांनी शिफारस केली. तेव्हापासून चंदेल जिल्हाप्रमुख झाले. प्रत्येक तालुक्यामध्ये गट बाजीचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेनेचे राजकारण भविष्यात शून्य होण्याच्या परिस्थितीत दिसत असून यावर जर पुन्हा शिवसेनेचे दिवस समोर चांगले आणायचे असतील तर किशोर पोद्दार सहित सुरेंद्रसिंह चंदेल यांचे सुद्धा पद तत्काळ काढण्यात यावे अशी एकमुखी मागणी आरमोरी येथील आढावा बैठकीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले सदर आढावा सभेला अध्यक्ष म्हणून माजी आमदार डॉक्टर रामकृष्ण मडावी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघटक डॉक्टर श्रीकांत बनसोड, समन्वयक गडचिरोली जिल्ह्याचे गोपाल भाऊ चौधरी,राजूभाऊ अंबानी जिल्हा संघटक गडचिरोली, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या कल्पनाताई तिजारे, जिल्हा संघटक मीनल बनसोड ,संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विलास ठाकरे,होमराज गायकवाड, विजय सहारे तालुकाप्रमुख वडसा, दशरथ पिलारे माजी तालुकाप्रमुख, रामकृष्ण पारधी माजी सभापती पंचायत समिती वडसा,अशोकजी माडावर ,वंदना रामटेके,गोविंदा कोपरे,ज्येष्ठ शिवसैनिक बोरकर, शिवसैनिक आदींनी यासभेमध्ये आपले मत व्यक्त केले सदर आढावा बैठकिला जिल्हातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आढावा बैठकीचे संचालन माजी तालुका प्रमुख वडसाचे विठ्ठल ढोरे यांनी केले तर आभार आरमोरी चे तालुका प्रमुख महेंद्र शेंडे यांनी मानले
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)