गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक : जिल्ह्यात तसेच जिल्यातील आजू बाजूला असलेल्या गावात आणि संपूर्ण जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण हे पूर्णपणे भरले असून त्यामुळे धरणा मधून प्रथमच 6000 हजार क्यूसेक वेगाने धरणातील पाणी सोडले असून त्यामुळे जिल्ह्यातील तसेच आजू बाजूच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने आज गंगापूर धरणातून विसर्ग दुपारी १ वाजेपासून ६००० क्युसेक्स. नाशिकमध्ये पुन्हा पूरसदृष्य परिस्थिती. गोदाकाठावरील मंदिरे व दुकाने पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणीपातळी वाढली असून अद्याप पाऊस चालूच असल्यामुळे विसर्ग वाढल्यास पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे.