शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे व 12 गावातील नागरिकांचा ईशारा.
आलापल्ली उपवनसंरक्षकांना दिले निवेदन.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/आष्टी- गडचिरोली जिल्हातील आष्टी परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्याने कहर माजविला या परिसरामध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे.या नरभक्षक बिबट्याने 15 सप्टेंबरला मनोज देवावार या 7 वर्षीय मुलाला ठार केले.आष्टी पेपर मिल कॉलनीतील 9 वर्षीय मुलास गंभीर जखमी केले.बकऱ्या,कोंबडे व जनावरांचा तर दररोज फडशा पाडत आहे. या परीसरामध्ये नरभक्षक बिबट्या भरदिवसा गावात शिरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.त्यामुळे पुन्हा मनुष्यहानी टाळण्यासाठी या नरभक्षक बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनाचे उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वात 12 गावातील नागरिकांनी आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक के. पाठक यांना मार्कण्डा कंसोबा येथे निवेदनाद्वारे देण्यात आले.तसेच यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहायकाशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करून उपवनसंरक्षक के. पाठक यांच्याशी या विषयावर सवांद साधून देण्यात आला.यावेळी आष्टीच्या सरपंचा बेबीताई बुरांडे, मार्कंडा च्या सरपंचा वनश्री चापले, चौडमपल्लीचे सरपंच निखिल मडावी, अनखोडा उपसरपंच वसंत चौधरी, ग्रा. प. सदस्य विजुभाऊ बहिरेवार, आष्टीचे उपसरपंच सत्यशील डोर्लीकर, ग्रा. प सदस्य संतोष बारापात्रे, विनोद दुर्गे,राजू एडलावार,अंतु तांगडे, दिवाकर मुत्तेवार, दिलीप कर्डेवार,वतीश चहारे, नामु बोरकुटे, बंडू कुबडे,गणेश डोमटवार,राकेश जोरगलवार,सुरेश औतकार,रामकृष्ण नायगमकार,आकाश उराडे, शुभम औतकार, अमोत कुकुडकर, आदी उपस्थित होते.