महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड
आज दि. 9 सप्टेंबर रोजी माजी अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजयकुमार राठोड यांची भेट घेऊन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात सविस्तर चर्चा केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे, फळबागांचे तसेच जमिनीचे तात्काळ पंचनामे करून तसा अहवाल शासनास सादर करावा अशी मागणी केली . यासंदर्भात आपण लवकरच मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री विजयकुमार वेड्डेटीवार यांची भेट घेणार असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी करणार असून असे अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणुन संबंधित कंपन्यांनी तात्काळ कारवाई करावी अशा सुचना जिल्हाधिकारी हे विमा कंपन्यांना कराणार आहेत .तसेच याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली.