सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर तालुका हा शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात असल्याने, शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, शेतकरी बांधवांनी फळबाग शेतीकडे वळावे असे आव्हान भुमिपुत्र सुनील मोहरूत यांनी युवा शेतकऱ्यांना आवाहन केले.
मेहकर तालुक्यामधील शेतकरी बांधव पारंपारिक खरीप व रब्बी पिके घेत असल्याने त्यांना आवश्यकतेप्रमाणे उत्पन्न होत नसल्याने शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने शेतकरी कर्जाच्या चिंतेत आपली जीवन यात्रा संपत असल्याने मेहकर तालुका हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जात आहे. मेहकर तालुक्यामधील शेतकरी बांधवांनी कर्जाचा डोंगरा पाई आत्महत्या न करता, युवा शेतकऱ्यांनी व कृतिशील शेतकऱ्यांनी फळबाग शेतीकडे वळण्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाल्याने कर्जमुक्त शेतकरी म्हणून अस्तित्वाचे कुटुंबाचे जीवन जगेल असे मत व्यक्त केले आहे, ग्रामपंचायत थार येथे त्यानी संत्रा मोसंबी ची लागवड केली सन 2004मध्ये 20×20अंतरावर मोसंबी लागवड केली आहे.तर 2005ते2015 पर्यंत द्राक्ष लागवड केली होती.पाहीजे त्या प्रमाणामध्ये अपेक्षित द्राक्षचे उत्पादन झाले नाही. द्राक्ष च्या शेतामध्ये सन 2015 मध्ये 16×16 संत्रा लागवड केली . संत्रा व मोसंबी लागवड साठी कोणत्याही प्रकारे शासकीय अनुदान न घेता ही लागवड केली आहे.तरी थार परिसरातील शेतकऱ्यांनी सन 2016पासुन फार मोठ्या प्रमाणावर फळबागांची लागवड केली आहे.त्यांनी शासकीय अनुदान चा ही लाभ झाला आहे.त्यामध्ये
लिबु संत्रा सीताफळ, जांब, , जाभुळ ,आवळा, अंबा असे सर्व प्रकार ची फळे व झाडे लागवड केली आहे तरी भविष्यात लाखो रुपयांचे परिसरातील शेतकऱ्यांना उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे . व आपले मुले विविध क्षेत्रामध्ये अस्तित्व घडवतील. राष्ट्रीय समृद्धी महामार्ग तयार होत असल्याने आपल्या शेतामधील फळे व भाजीपाला परदेशातही विकू शकतो किंवा इतर राज्यांमध्ये विकू किंवा मोठ्या बाजारपेठेत विक्री करु शकतो ,यासाठी शेतकरी बांधवांनी फळबागा कडे वळावे असे आवाहन सुनील मोहरूत यांनी केले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)