किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : अंधारसांगवी येथील शेतकऱ्यांचे ढगफुटीमुळे खरडुन गेलेल्या शेतीची व पिकांची झालेली नुकसान भरपाई पाहणी व सर्वे करून मदत मिळविण्यासाठी पातूर भाजपाचे तहसीलदाराना निवेदन आज दिनांक २७-०८-२०२१ रोजी अंधारसांगवी येथील शेतकऱ्यांच्या पिकाची २२ -०८-२०२१ रोजी झालेल्या ढगफुटीमुळे व अती पावसामुळे शेतजमीन खरडुन गेलेली आहे व मोठ्या प्रमाणात पिकाचे व शेतीचे नुकसान झाले आहे ,आतापर्यंत प्रशासनाने या खरडुन गेलेल्या शेतजमीनीचे व पिकांचे सर्वे केलेले नाही व महसूल विभागातील अधिकारी आतापर्यंत सर्वे करण्यासाठी आलेले नाहीत तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वे व तात्काळ मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहरा तर्फे तहसीलदाराना निवेदन देवून करण्यात आली.
यावेळी भाजपचे रमण जैन ,चंद्रकांत अंधारे ,कपिल खरप ,श्रीकृष्ण लठाड ,अभिजीत गहिलोत ,विनेश चव्हाण ,शिवाजीराव नपते,सचिन बायस ,गजानन शेंडे ,शशिकांत भरकर ,गणेश गाडगे ,सचिन बारोकार,किरण टप्पे ,संदीप ईंगळे ,अजय गोसावी ,भिकाजी काकड ,पंडित चौरे ,बबन शिंदे ,नंदु देवकर ,दतात्रेय जठाळे ,बबन त्रंबक देवकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते