अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : अंकुर साहित्य संघाची नुतन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली असून त्यामध्ये अंकुर साहित्य संघाच्या केंद्रीय अध्यक्ष पदी प्रसिद्ध साहित्यिक श्री हिंमत ढाळे यांची तर सचिवपदी प्रसिद्ध हास्यकवी प्रा. संजय कावरे तर सहसचिव पदी व-हाडधनकार शिवलिंग काटेकर आणि विदर्भ प्रमुख पदी प्रसिद्ध साहित्यिक वासुदेव खोपडे यांची निवड करण्यात आली ज्येष्ठांचा नवोदितांना प्रोत्साहन हे ब्रीद वाक्य घेऊन १९८६ ला स्थापन झालेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर सहा राज्यांत पसरलेल्या अंकुर साहित्य संघाचा ३५ वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंकुर साहित्य संघाचे माजी केंद्रीय अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक मा.डाॅ प्रमोद काकडे, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे तर विशेष अतिथी प्रा. मधुकर वडोदे, प्रा. सदाशिव शेळके,देवानंद गहिले महिलाआघाडीच्या अध्यक्षा विद्याताई बनाफर हे प्रमुख अतिथी होते.*प्रकृती स्वास्थ्यामुळे अंकुरच्या राजमाता मा.शीलाताई राजपूत उपस्थित राहू शकल्या नाहीत, तरी त्यांनी या कार्यक्रमाला आणि नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा पाठविल्या आणि आशीर्वाद दिला. स्वर्गीय हिंमत शेकोकार स्व.अरविंद भोंडे स्व संतोष कोकाटे स्व.सैय्यद अहमद यांच्या आकस्मिक जाण्यामूळे अंकुर साहित्य संघात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आणि ती लवकर भरून निघणे कठीण असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले परंतु नुतन कार्यकारिणीत झालेले बदल ही पोकळी भरून काढेल असा विश्वासही अतिथींनी व्यक्त केला आहे.अंकुर साहित्य संघ हा महाराष्ट्रात सर्व दूरपर्यंत पसरलेला संघ आहे. अंकुरचे आतापर्यंत ५८ साहित्य संमेलन पार पडली आहेत. साहित्य क्षेत्रात आपल्या लेखनीने नावलौकिक प्राप्त केलेले अनेक साहित्यिक अंकुरचे संमेलनाध्यक्ष राहिलेले आहेत, स्व.उद्धव शेळके,गीतकार जगदीश खेबुडकर, फ.मु.शिंदे, डॉ. विठ्ठल वाघ,डॉ. सिंधुताई सपकाळ, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. मधुकर वाकोडे, डॉ. प्रतिमा इंगोले,श्री. सुधाकर गायधनी, स्व.भगवान ठक,श्री. ना.च कांबळे, स्व. प्रा. डॉ. भाऊ मांडवकर प्रा.मा. म. देशमुख, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. बापुराव झटाले, श्री. बाबाराव मुसळे असे कितीतरी साहित्यिक अंकुरच्या साहित्य संमेलनाच्या विचारपिठावर आलेले आहेत. अशी उज्वल परंपरा लाभलेल्या या अंकुर साहित्य संघाची धूरा या कार्यकारिणीला सांभाळून साहित्य क्षेत्रात हा लौकिक कायम ठेवायचा आहे.आजच्या वैज्ञानिक युगात प्रसार आणि प्रचाराची साधने, माध्यमे अत्यंत गतिशील झाली आहे. या ग्लोबल व्हिलेज च्या युगात साहित्यिक क्षेत्रसुद्धा झपाट्याने बदलत आहे. या बदलणाऱ्या काळाबरोबर चालणे ही साहित्य रसिकांची मागणी आहे. त्यामुळे डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग येणाऱ्या काळात करावा लागेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. अंकुर साहित्य संघांच्या नवीन पदाधिका-यांचे महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्र बाहेरून अभिनंदन होत आहे. कोरोना काळ संपल्यानंतर लवकरच ५९ व्या साहित्य संमेलनाची रूपरेषा आखली जाईल असे नवनिर्वाचित केंद्रीय अध्यक्ष श्री हिंमत ढाळे यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमाला रूस्तम होनाळे शालीग्राम वाडे कृष्णराव घाडगे प्रा मोहन काळे अमोल गोंडचवर मारोती नागोसे प्रभाकर दिवनाले प्रिया भोंडे सुरेश लांडे बाळासाहेब सोळंके गजानन छबिले अंबादास चांदूरकर सुनिल लव्हाळे प्रशांत भोंडे सुनिल दिवनाले प्रा. एस बी पालकर गोपाल मापारी अभिजीत लांडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन गजानन छबिले यांनी केले तर आभार प्रा संजय कावरे यांनी मानले
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)