बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. परिणामी खरीपाची पिके पावसासाठी आसुसली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचन सुरू केले. तर व्यवस्था नसलेले शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करीत होते. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात कुठे जोरदार, तर कुठे रिपरिप पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्हावासियांना अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त 20.7 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आज 20 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची – सर्वात जास्त पाऊस संग्रामपूर : 20.7 मि.मी (395.6 मि. मी), मलकापूर : 20.6 (267.7 मि. मी), जळगांव जामोद : 16.6 (207.6), नांदुरा: 11.9 (296), दे.राजा : 10 (440.9), शेगांव : 9.3 (240.7), लोणार : 8.3 (588.2), मोताळा : 8.3 (315.1), चिखली : 7.4 (505.6), सिं. राजा : 7 (632.7), बुलडाणा : 6.4 (430.5), खामगांव : 5.1 (435.8) आणि सर्वात कमी मेहकर तालुक्यात 4.9 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. आजपर्यंत सर्वात कमी 207.6 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 136.5 मि. मी पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 10.5 मि. मी आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 776 मि.मी पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस जळगांव जामोद तालुक्यात 207.6 मि.मी झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2021 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 425.6 मि. मी आहे.











