सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
दि. १७ जून २०२३ जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.त्यमुळे गुन्हेगार जोमात अन जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन कोमात गेल्यासारखे चित्र सध्यातरी संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाचा आणि पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांना विसर पडला असून जिल्ह्यात कोणाचाच धाक राहिलेला नाही. भरदिवसा जिल्ह्यातील शहरांमध्ये ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच मटका गांजा तस्करी,अशा अनेक गुन्हेगारी प्रकरणात वाढ झालेली दिसून येत आहे. सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे की नेमका न्याय कोणाकडे मागावा. कारण जिल्ह्यात घडलेली कोणतीही गुन्हेगारी घटना आणि गुन्हा केलेला गुन्हेगार कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता असल्याने राजकीय दबावामुळे जिल्ह्याप्रशासन आणि पोलिस प्रशासन अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जनतेतून होताना दिसतो आहे त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा गुन्हेगारांसमोर हतबल झाल्याचे मत जिल्ह्यातील नागरिकांमधून येत आहे. पोलिस प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गुन्हेगार सोडुन सामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. पोलिस प्रशासनाच्या अशा प्रवृत्ती मुळे पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून पोलिस प्रशासनाने अशा पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना ताकिद द्यावी. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित ठेवायची असेल तर पोलिस प्रशासनाने जिल्ह्याभरातील गुन्हेगारांना खाकी हिसका दाखवणे ही काळाची गरज झाली आहे.